AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या मनात नेमकं काय? आधी शाह, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला दांडी, राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शेवटची सभा झाली. या सभेत महायुतीचे उमेदवार उपस्थित होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते गैरहजर होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवारांच्या मनात नेमकं काय? आधी शाह, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला दांडी, राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर
| Updated on: Nov 15, 2024 | 11:13 AM
Share

PM Narendra Modi Mumbai Rally : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यातच काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतली. मात्र या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची शेवटची सभा पार पडली. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ ही सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी दांडी मारली. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले नाहीत. तसेच राष्ट्रवादीचे मुंबईतील उमेदवार सना मलिक, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी हे देखील अनुपस्थितीत होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. या सभेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थितीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीसाठी ही माझी शेवटची सभा आहे. निवडणुकीदरम्यान मी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला. प्रत्येक भागातल्या लोकांशी माझं बोलणं झालं आणि आता मी आमच्या मुंबईमध्ये आहे. सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुती सोबत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य असतं की देशाला आपल्या पक्षापेक्षा वर ठेवावे. भाजपचे महायुतीची हीच नीती आहे पण महाविकास आघाडीवाल्यांसाठी देशाच्या वर त्यांचा पक्ष आहे. देश पुढे जातो तेव्हा महाविकास आघाडीला दुःख होतं. भारताच्या प्रत्येक यशावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करतात. याच लोकांनी अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहायचं आहे,” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.