AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाचे बेत रद्द, जेवणाचेही वांदे, तुमचे आवडते हॉटेल सुरु की बंद, कुठे काय स्थिती?

महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पुणे, ठाणे आणि नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल्स बंद झाली आहेत. लग्नसराईच्या काळात केटरर्स हतबल झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

लग्नाचे बेत रद्द, जेवणाचेही वांदे, तुमचे आवडते हॉटेल सुरु की बंद, कुठे काय स्थिती?
gas shortage
| Updated on: Mar 12, 2026 | 11:14 AM
Share

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट महाराष्ट्राला बसू लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) सिलेंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर आणि धुळे यांसारख्या प्रमुख शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. राज्यातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सनी गॅस नाही असे बोर्ड लावून आपले व्यवसाय बंद केले आहेत.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा फटका आता मुंबईतील खाद्यसंस्कृतीला बसू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील फोर्ट परिसरातील १७८ वर्षे जुन्या पंचम पुरीवाला हॉटेलमध्ये गॅसच्या कमतरतेमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. १८४८ पासून कार्यरत असलेल्या या हॉटेलमध्ये साधारण ७९ प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. मात्र आता केवळ ‘पुरी-भाजी’ आणि ‘आमरस-पुरी’ असे दोनच पदार्थ ग्राहकांना मिळत आहेत. मर्यादित गॅस साठ्यामुळे व्यवस्थापनाला ओळखीच्या लोकांकडून सिलिंडरची मदत घ्यावी लागत असून, या परिस्थितीमुळे हॉटेलच्या दैनंदिन उत्पन्नावरही गंभीर परिणाम झाला आहे.

पुणे-ठाण्यातील चव हरवली; प्रसिद्ध हॉटेल्सना टाळे

पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅसअभावी बंद झाले आहे. बादशाही हॉटेलने हॉटेलबाहेर गॅस संपल्याचा बोर्ड लावला आहे. यामुळे खवय्ये हताश होऊन परतत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यातही अशीच परिस्थिती उद्भवली आहे. कोपरी येथील शिवम हॉटेल गॅसअभावी बंद करण्यात आले आहे. यानंतर केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर सँडविच आणि पिझ्झा दिला जात आहे. मात्र, चहा-नाश्ता आणि जेवण बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाणे खोपट एसटी डेपोतील कॅन्टीनमध्येही गॅस नसल्याने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

रवि भवनमध्ये मंत्र्यांच्या जेवणावरही संकट

नागपुरातील खापरी येथील एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. केवळ घरगुती सिलेंडरवर भर दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्र अडचणीत आले आहे. आश्चर्य म्हणजे मंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या रवि भवन मधील व्हीव्हीआयपी कॅन्टीनलाही सिलेंडर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी चार-चार इलेक्ट्रिक शेगड्या लावून जेवण बनवण्याची कसरत सुरु केली आहे.

लग्नाचे बेत रद्द, केटरर्सनी फिरवले हात

ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा तुटवडा जाणवल्याने केटरर्स व्यावसायिक हतबल झाले आहेत. नागपूरचे केटरर्स दीपक मिश्रा यांनी सांगितले की हजारो लोकांसाठी चुलीवर जेवण बनवणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या ऑर्डर्सचे ॲडव्हान्स पैसे परत करत आहोत. लग्नसराईत काम करणाऱ्या मजुरांच्या हाताचे कामही यामुळे गेले आहे.

विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न 

भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीमध्ये १२०० विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवले जाते. मात्र आता केवळ दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याने शाळा प्रशासन धास्तावले आहे. गॅस न मिळाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुलीवर जेवण कसे बनवायचे, असा सवाल मुख्याध्यापक नरेंद्र पालांदुरकर यांना पडला आहे.

तर उन्हाळ्याच्या कडाक्यात चुलीवर काम करणे कामगारांना शक्य नाही, असे धुळ्यातील हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे. सोलापूरमधील छोटे हॉटेल व्यावसायिक बळीराम जांभळे यांच्यासारख्या अनेकांचे २१ लोकांचे कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे, जे आता धोक्यात आले आहे. तसेच रत्नागिरीत युद्धामुळे गॅस टंचाई अधिक वाढेल या भीतीने घरगुती ग्राहकांनी गॅस एजन्सीबाहेर पाच-पाच दिवस रांगा लावल्या आहेत. शांतादुर्गा गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...