AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Slum Development | मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईकरांच हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर

Mumbai Slum Development | मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
| Updated on: May 25, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई | स्वप्ननगरी, मायानगरी अशी अनेक विशेषणं मुंबईसाठी कमी पडतील. मुंबईत दररोज असंख्य जण हजारो स्वप्न उराशी घेऊन येतात. मुंबईत नोकरी मिळाल्यानंतर आपलं हक्काचं घर व्हावं, हे प्रत्येक सामन्य व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र अवाढव्य वाढलेल्या घरांच्या किमतींमुळे मुंबईकरांचं घरं घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. यामुळे अनेक मुंबईकर हे गेले कित्येक वर्ष झोपडीत राहतायेत. मुंबईच्या झोपडीत अनेक पिढी वाढल्या, मोठ्या झाल्या. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न मात्र काही पूर्ण झालं नाही. मात्र आता या घराबाबत राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

मुंबईकर झोपडीधारकांना अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांमध्ये घर मिळणार आहे. मुंबईकरांना झोपडीच्या बदल्यात सशुल्क हक्काचं घर मिळणार आहे. हक्काच्या घरासाठी मुंबईकरांना 2 लाख 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यात मुंबईकरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मुंबई नियमांनुसार आधी आपण 2 हजार या वर्षापर्यंतच्या झोपडीधारकांना मोफत घरं देत होतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला. त्या कायद्यानुसार आम्ही 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांना पात्र ठरवलं. पण न्यायालयाच्या निर्णयानुसार 2000 ते 2011 या कालावधीतील झोपडीधारकांना घरं ही सशुल्क देता येत होतं, त्यांना मोफत देणं शक्य नव्हतं. त्याबाबतचे दर निश्चित करायचे होते. ते दर आता आम्ही ठरवले आहेत. आता फक्त अडीच लाख रुपयात घर देणार आहोत. यासाठी पीएमएवायचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे झोपडीधारकावर भार येणार नाही”, असं म्हणत फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच पीएमएवाय योजनमुळे आर्थिक बोजाही पडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.

मुंबईकरांना मोठा दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

गृहनिर्माण मंत्र्याना आव्हाडांची विनंती

आव्हाडांनी फडणवीस यांचं अभिनंदन करताना विनंतीही करणार असल्याचं म्हटलं. “मालकाला एकदा झोपडीचा एलवाय आला की अडीच वर्षात ती विकता आली पाहिजे”, अशा आशयाची मागणी आव्हाड फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. त्यामुळे आता  आव्हाडांनी ही विनंती केल्यानंतर फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे तमाम मुंबईकरांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.