AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाकाळात महाविकास आघाडीकडून 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; या पक्षाने थेट आरोग्य मंत्र्याकडेच केली तक्रार

रेमडिसिव्हर इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतची तक्रारही त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.

कोरोनाकाळात महाविकास आघाडीकडून 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; या पक्षाने थेट आरोग्य मंत्र्याकडेच केली तक्रार
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 27, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : कोरोना काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेरच पडले नाहीत अशी वारंवार टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. त्यातच किरीट सोमय्या यांच्याकडूनही कोरोना काळात आरोग्य विभागामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही केला जातो. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता थेट त्या वेळचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारकडून जवळपास 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपर मनसेकडून करण्यात आला आहे. त्याप्रकारची तक्रार त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही करण्यात आली आहे.

या घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या शिष्टमंडळाने तानाजी सावंत यांची भेट घेऊन ही तक्रार दाखल करणार आहेत.

या तक्रारीमुळे आता पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना काळात महाविकास आघाडीने नागरिकांच्या आरोग्य बाबत काळजी घेतली.

नवनव्या योजना आखून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी कशी होईल याकडे लक्ष दिले गेले हे महाविकास आघाडीनेही वेळोवेळी सांगितले आहे.

त्याबाबत राष्ट्रीय पातळीवरही उद्धव ठाकरे यांचा गौरव केला आहे. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

त्याकाळी 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात आल्या.

या योजना नागरिकांसाठी राबवण्यात आल्या असल्या तरी, त्यामध्ये त्या काळातील आरोग्य मंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना काळात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी करण्त यावी अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना काळात जो घोटाळा झाला आहे,

त्यावेळी रेमडिसिव्हर इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतची तक्रारही त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.

Follow Us
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर