AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : कोर्टाने काल दिलेल्या आदेशांवर आज मनोज जरांगेंचे वकील म्हणाले की…

Manoj Jarange Patil : आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं.

Manoj Jarange Patil : कोर्टाने काल दिलेल्या आदेशांवर आज मनोज जरांगेंचे वकील म्हणाले की...
| Updated on: Sep 02, 2025 | 10:54 AM
Share

मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. काल या आंदोलनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने काही महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आज 2 सप्टेंबर दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका तसेच हे आंदोलक आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील इतर भागात फिरत असतील तर त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. काल कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी आंदोलनाच्या विरोधात असणारे वकील गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्त्यांनी आंदोलकांकडून नियमांचं कसं उल्लंघन झालं? त्याची माहिती दिली.

काल कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने काही मुद्यांवरुन आंदोलकांना फटकारलं. आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं. तसेच आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असंही कोर्टाने म्हटलं.

‘एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत’

आज मनोज जरांगे पाटील यांचे वकील मीडियाशी बोलले आहेत. “घटनादत्त अधिकार आंदोलन करण्यासाठी देऊ शकता, मोर्चे काढण्यासाठी परवानगी देऊ शकता. सभा भरवण्यासाठी परवानगी देऊ शकता. मग, आंदोलन जर आमरण उपोषण असेल तर ते वेगळं कसं काय? एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत” असं मनोज जरांगेंचे वकिल म्हणाले.

‘कोर्टात त्यावर काय उत्तर देणार ते तुम्ही ऐका’

नोटीसच्या प्रश्नावर म्हणाले की, “आझाद मैदान पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे. कोर्टात त्यावर काय उत्तर देणार ते तुम्ही ऐका. कालच्या सूचना पाळल्या. बऱ्याच गाड्या काढल्या, त्या तुम्ही दाखवा” असं मनोज जरांगेंचे वकील म्हणाले.

आज मनोज जरांगे पाटील स्वत: म्हणाले की, “रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेऊ नका घेऊन गेलो. सीएसटी बीएमसी रिकामी करा, केली. कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं? देवेंद्र फडणवीस यांनी अन्यायकारक आमच्याशी वागू नये”

Follow Us
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय.....
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान.
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका.