AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मागणी

मराठा आंदोलनाचे प्रमुख असलेले मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. जरांगे सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांंचं नाव घेत पाहा नेमकी कोणती मागणी केली आहे.

जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली 'ही' मागणी
| Updated on: Feb 25, 2024 | 4:59 PM
Share

मुंबई : गेले अनेक दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली येथील आपल्या सभेमध्ये बोलताना शेवटच्या टप्प्यात आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा असल्याचं म्हणत आपल्याला मारण्यासाठी षडयंत्र रचल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. आता जरांगे मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलं आहे. परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तजित केलं आहेत. रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणामध्ये आक्रमक होत आंदोलनस्थळ सोडत अंतरवाली येथून चालायला सुरूवात केली. मनोज जरांगे पायी  सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र  समाजाच्या बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवलं. कारण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्यानं  जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे.

जरागेंनी फडणवीसांवर कोणते आरोप केले?

पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.