AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मागणी

मराठा आंदोलनाचे प्रमुख असलेले मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. जरांगे सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांंचं नाव घेत पाहा नेमकी कोणती मागणी केली आहे.

जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली 'ही' मागणी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 25, 2024 | 4:59 PM
Share

मुंबई : गेले अनेक दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली येथील आपल्या सभेमध्ये बोलताना शेवटच्या टप्प्यात आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा असल्याचं म्हणत आपल्याला मारण्यासाठी षडयंत्र रचल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. आता जरांगे मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलं आहे. परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तजित केलं आहेत. रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणामध्ये आक्रमक होत आंदोलनस्थळ सोडत अंतरवाली येथून चालायला सुरूवात केली. मनोज जरांगे पायी  सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र  समाजाच्या बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवलं. कारण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्यानं  जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे.

जरागेंनी फडणवीसांवर कोणते आरोप केले?

पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत