AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु
Migrant workers Leaving mumbai
| Updated on: Apr 03, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही तसा इशारा दिला आहे. जर पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी दरडावलं आहे. (Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा होऊ नयेत, या भीतीने मुंबईसह मोठ्या शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा, झारखंडला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर असल्याने दुकाने ,उपहारगृहे ,लहान कंपन्यांमधील कामगार , लघु व्यवसायिक ,रोजंदारीवरील मजूर टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको या भीतीने कामगारांनी घराची वाट धरली आहे.

आधीपासून खबरदारी

मुंबईतून अनेक कामगार आपल्या गावी परतत असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले होते. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी विस्थापित कामगार आधीपासूनच खबरदारी घेत आहेत.

नांदेडमधील मजूरही गावी निघाले

नांदेडमध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात आहेत. काही दिवसापूर्वीच नांदेडच्या रेल्वे स्थानकांवर शेकडो मजुरांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. काहींनी तात्काळमध्ये प्रवासाचे आरक्षण काढून गावाकडचा रस्ता धरला. तर काही जणांची जमेल तसा प्रवास करण्याची तयारी आहे.

मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल”, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय जो पर्याय असेल तो सांगा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुण्यात मिनी लॉकडाऊन

पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. आजपासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?

(Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.