AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत.

Migrant workers : मजुरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती, घरी परतण्याची तयारी सुरु
Migrant workers Leaving mumbai
| Updated on: Apr 03, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या (Maharashtra secon lockdown) हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही तसा इशारा दिला आहे. जर पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी दरडावलं आहे. (Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा होऊ नयेत, या भीतीने मुंबईसह मोठ्या शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा, झारखंडला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर असल्याने दुकाने ,उपहारगृहे ,लहान कंपन्यांमधील कामगार , लघु व्यवसायिक ,रोजंदारीवरील मजूर टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको या भीतीने कामगारांनी घराची वाट धरली आहे.

आधीपासून खबरदारी

मुंबईतून अनेक कामगार आपल्या गावी परतत असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले होते. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी विस्थापित कामगार आधीपासूनच खबरदारी घेत आहेत.

नांदेडमधील मजूरही गावी निघाले

नांदेडमध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात आहेत. काही दिवसापूर्वीच नांदेडच्या रेल्वे स्थानकांवर शेकडो मजुरांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. काहींनी तात्काळमध्ये प्रवासाचे आरक्षण काढून गावाकडचा रस्ता धरला. तर काही जणांची जमेल तसा प्रवास करण्याची तयारी आहे.

मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल”, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय जो पर्याय असेल तो सांगा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुण्यात मिनी लॉकडाऊन

पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. आजपासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?

(Migrant workers Leaving Mumbai as fear of Maharashtra second lockdown after CM Uddhav Thackeray interaction)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.