AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती

मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने दोन नव्या कोव्हिड रुग्णालयांना नुकतंच मान्यता दिली (Mira Bhayandar recruitment) आहे.

मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती
| Updated on: Jun 16, 2020 | 11:47 PM
Share

मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने दोन नव्या कोव्हिड रुग्णालयांना नुकतंच मान्यता दिली आहे. या दोन्ही रुग्णालयात मिळून 376 खाटा उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही रुग्णांसाठी महापालिकेकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारीच नसल्याने आता महापालिकेने त्यांची 819 पदासाठी नेमणूक या सुरु केली आहे. येत्या शनिवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. (Mira Bhayandar recruitment)

मिरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1792 इतकी झाली आहे. दरम्यान सध्या रुग्णालयात 995 जणांवर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये मृत्यूंची संख्या 88 इतकी आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त रुग्ण सामावून घेण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये नवीन कोव्हिड रुग्णालयाला मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.

या मागणीनुसार महापालिकेच्या मीरा रोड येथील प्रमोद महाजन इमारत आणि मीनाताई ठाकरे इमारत याठिकाणी अनुक्रमे 206 आणि 170 खाटांची कोविड रुग्णालये सुरु करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. यासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. याव्यतिरिक्त आणखी 450 खाटांच्या रुग्णालयाला देखील लवकरच शासनाकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे .

कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यास मान्यता मिळाली असली तरी रुग्णालयात आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णालय सुरु कशी करायची असा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे.

यासाठी महापालिकेने आता कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती 3 महिने किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असेपर्यंत असणार आहे. इच्छुकांनी येत्या 20 जूनपर्यंत महापालिका मुख्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. (Mira Bhayandar recruitment)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | दिवसभरात 178 कोरोनाबळी, एका दिवसातील मृत्यूचा सर्वोच्च आकडा

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक