AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या सहा महिन्यात जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासून आघाडी सरकराच जबाबदार आहे.

VIDEO: एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार; आशिष शेलार यांचा हल्लाबोल
ashish shelar
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई: राज्यात गेल्या सहा महिन्यात जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासून आघाडी सरकराच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी आंदोलक एसटी कामगाारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ही टीका केली.

एसटी कामगारांशी गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. 40 जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी यावेळी केली. एसटीचे राज्य शासनात विलनीकरण, सहावा वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी या कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या मान्य करा आणि एसटी कामगार जगवा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

तर आम्ही परत येतोय…

शासकीय कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या. एवढीच कामगारांची मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करु. पण नाही केलत तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा. ही लढाई केवळ एसटी कामगारांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरिब, दलित, पिडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे, असं त्यांनी सांगितलं.

उद्या महापालिका आयुक्तांना भेटणार

आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे 80 हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत. पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवालही त्यांनी केला. उद्या यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याच ही ते म्हणाले.

हे तर काळीज नसलेलं सरकार

मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे. मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 40 जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायाचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.