AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाबद्दल न्याय होऊ देत”; ‘या’ नेत्याचे थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान

आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रस्त्यावर उतरावं नंतर त्यांनी सवाल उपस्थित करावे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाबद्दल न्याय होऊ देत; 'या' नेत्याचे थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 03, 2023 | 6:51 PM
Share

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामाही मागण्यात आला. त्यानंतर भाजपसह शिंदे गटानेही रस्त्यावर उतरुन अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ निघालेल्या मोर्चावर माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना सवाल उपस्थित करण्यात आले.

त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते.

त्यावेळी हे सन्मानार्थ मोर्चे काढणारे कुठे होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जे आज रस्त्यावर उतरलेले आहेत.

त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रस्त्यावर उतरावं नंतर त्यांनी सवाल उपस्थित करावे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही भूमिका मांडत आहोत.

मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यासाठी नेमलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून परत पाठवा अशीही मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अपमानजनक वक्तव्य करूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा साधा निषेधही नोंदविला नाही.

आणि त्यांचीच लोकं आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर पुढचं बघू असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती