वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार, आता १ एप्रिलपासून खिशाला कात्री

Mumbai Bandra Worli sea link Toll: वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवर यापूर्वी कार आणि जीपकडून ८५ रुपये घेतले जात होते. ते आता शंभर रुपये झाले आहे. मिनी बसकडून १३० रुपये घेतले जात होते. त्यात ३० रुपयांची वाढ करुन १६० रुपये करण्यात आला आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार, आता १ एप्रिलपासून खिशाला कात्री
Mumbai Bandra Worli sea link
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 10:29 AM

मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता ठरलेला वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) जाताना आता जादा टोल द्यावा लागणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला १ एप्रिलपासून कात्री लागणार आहे. या ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. पुलावरील पथकरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अशी केली वाढ

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १५ रुपयांची वाढ केली आहे. सागरी सेतूवरुन जाणाऱ्या कारचालकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता १६० रुपये पथकर भरावा लागणार आहे. तसेच ट्रक आणि बसला २१० रुपये पथकर द्यावा लागेल.

यापूर्वी असे होते दर

वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवर यापूर्वी कार आणि जीपकडून ८५ रुपये घेतले जात होते. ते आता शंभर रुपये झाले आहे. मिनी बसकडून १३० रुपये घेतले जात होते. त्यात ३० रुपयांची वाढ करुन १६० रुपये करण्यात आला आहे. तसेच ट्रक किंवा बसकडून पूर्वी १७५ रुपये पथकर घेतला जात होता. तो आता ३५ रुपयांनी वाढवून २१० करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दर तीन वर्षांना होते वाढ

एमएसआरडीसी’कडून दर तीन वर्षांनी या रस्त्यावरील पथकरात वाढ केली जाते. याआधी एप्रिल २०२१ मध्ये पथकरात वाढ करण्यात आली होती. आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत नवे दर लागू असणार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबईतील दक्षिणी आणि पश्चिमी भाग जोडला गेला आहे. रास्ते मार्गाने या ठिकाणी जाण्यासाठी 60-90 मिनिटे लागत होते. आता केवळ 6-8 मिनिटे लागतात. 4.8 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.