AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना मनसेसोबत जाणार का? काँग्रेस नेत्याचे मोठे विधान, म्हणाले मुंबई महापौरपद…

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईचा पुढील महापौर काँग्रेसचाच असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.

शिवसेना मनसेसोबत जाणार का? काँग्रेस नेत्याचे मोठे विधान, म्हणाले मुंबई महापौरपद...
uddhav thackeray raj thackeray bmc
| Updated on: Nov 07, 2025 | 4:23 PM
Share

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने काम करत आहेत. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईच्या महापौराबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील गोंधळ, वंदे मातरम वाद आणि मुंबईकरांच्या समस्या यावरही सडेतोड उत्तरे दिले.

अस्लम शेख यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अस्लम शेख यांनी काँग्रेसचा महापौर बसवण्याचा ठाम दावा केला आहे. मुंबईचा पुढील महापौर काँग्रेसचाच असेल आणि मुंबईकरांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रथम प्राधान्य असेल, असे अस्लम शेख म्हणाले.

पहिला निर्णय मुंबईतील वाहतूक समस्या सोडवणे

मुंबईचा महापौर काँग्रेसचाच असणार आहे. भाजपने महापौरपदाची चिंता करण्याऐवजी मुंबईसाठी काय करणार, हे सांगावे. आमचा महापौर झाल्यानतंरचा पहिला निर्णय मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्याचा असेल, ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील. याशिवाय, आरोग्य व्यवस्था सुधारणे आणि तरुणांसाठी खेळण्याच्या जागा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे, यावरही लक्ष केंद्र करु, असे अस्लम शेख यांनी म्हटले.

तसेच अस्लम शेख यांनी शिवसेना आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केले. अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी करत आहेत. पण शिवसेना आणि मनसेसोबत युती करायची की नाही, हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणजेच हायकमांड) ठरवतील, असे अस्लम शेख म्हणाले.

इलेक्शन कमिशन झोपले आहे का?

यावेळी अस्लम शेख यांनी मतदार याद्यांमधील मोठ्या चुकांवरून निवडणूक आयोगावर (EC) थेट प्रश्नचिन्ह उभे केले. राहुल गांधी आणि मी स्वतः सुरुवातीपासूनच याद्या चुकीच्या असल्याचे सांगत आहोत. मालाडमध्ये १७ हजार डुप्लिकेट नावे आढळल्याचे आशिष शेलार यांनीही मान्य केले होते. इलेक्शन कमिशन झोपले आहे का? एकाच व्यक्तीचे तीन-तीन नावे आणि परदेशी लोकांची नावे याद्यांमध्ये येणे, ही सिस्टम लेव्हलवरची मोठी चूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या मतदारसंघांतही चुका आहेत. भाजपने प्रेस कॉन्फरन्स करण्याऐवजी या चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली.

गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर झाला आहे. या सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार केला गेला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. तुम्ही त्यांची चिंता करू नका, महापौर आमचाच बसणार. फक्त तुम्ही सांगा की मुंबईसाठी काय करणार आहात, असेही अस्लम शेख म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...