AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Boat Capsized: बोट अपघातात आठ जण बेपत्ता, बचावकार्यासाठी नौदलाच्या १४ बोटी अन् ४ हेलिकॉप्टर

Mumbai Boat Capsized: बोटीमध्ये ८० प्रवासी होते. त्यातील ६६ जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच आठ जण बेपत्ता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.

Mumbai Boat Capsized: बोट अपघातात आठ जण बेपत्ता, बचावकार्यासाठी नौदलाच्या १४ बोटी अन् ४ हेलिकॉप्टर
Mumbai Boat Capsized
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 18, 2024 | 7:18 PM
Share

Mumbai Boat Capsized: मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोटीमध्ये ८० प्रवासी होते. त्यातील ७७ जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच आठ जण बेपत्ता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

नौदलाकडून धडकेचा इन्कार

दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी पोहचले. नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे बोट पूर्णपणे पाण्यात बुडली. अपघात कसा झाला, ते चौकशीतून समोर येईल. परंतु आधी बोटीमधील प्रवाशांना वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान नौदलाकडून आमच्या बोटीने धडक दिल्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे.

रुग्णालयात दाखल काही जणांची प्रकृती गंभीर

दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशननंतर 56 जणांना जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच 9 प्रवाशांना नौदलाच्या डॉकयार्डमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील आठ जणांची प्रकृती स्थिर आहे. परंतु एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नऊ जणांना भरती केले आहे. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. बोटीत असणाऱ्या पाच क्रू मेंबर सुरक्षित आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी