AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हिंदू खतरमें? खरंच संख्या घटली? मग कोणाचा वाढणार टक्का; 50 वर्षांतील आकडेवारी सांगते काय

Mumbai Hindu Population : सध्या राज्यात बटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ है या दोन नव्या घोषणांनी कहर केला आहे. या दोन घोषणांनी राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या ध्रुवीकरणावर ताशेरे ओढले आहे. त्यातच मुंबईत हिंदूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे हा ताजा रिपोर्ट

मुंबईत हिंदू खतरमें? खरंच संख्या घटली? मग कोणाचा वाढणार टक्का; 50 वर्षांतील आकडेवारी सांगते काय
मुंबईत हिंदू खतरेमें?
| Updated on: Nov 12, 2024 | 10:15 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने ऐन हिवाळ्यात पारा चढला आहे. राज्यात बटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ है या दोन नव्या घोषणांनी धुमाकूळ घातला आहे. या दोन घोषणांनी राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या ध्रुवीकरणावर ताशेरे ओढले आहे. हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरणाचा फायदा लाटण्यासाठीच हा डाव टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. ऐन निवडणुकीत या मुद्दाने इतर मुद्दे मागे टाकले आहे. त्यातच मुंबईत हिंदूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे हा ताजा रिपोर्ट….

हिंदूची संख्या घटणार, काय सांगतो अहवाल

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (TISS) याविषयीचा एक अहवाल दिला आहे. त्यानुसार, मुंबईत हिंदूंची संख्या 88 ते 66 टक्क्यांवर आली आहे. या अहवालानुसार, 1961 मध्ये मुंबईत हिंदूची संख्या 88 टक्के होती. ती 2011 मध्ये 66 टक्क्यांपर्यंत खाली घसरली. तर या 50 वर्षांत हिंदूंच्या संख्येत केवळ 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर 1961 मध्ये मुस्लिम लोकसंख्या केवळ 8 टक्के होती. 2011 पर्यंत ही लोकसंख्या 21 टक्के इतकी झाली आहे. TISS च्या लोकसंख्येच्या अभ्यासानुसार, लोकसंख्येचे हे गुणोत्तर प्रमाण असेच राहिले तर येत्या 40 वर्षांत म्हणजे 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांहून अधिकने कमी होण्याची भीती आहे. तर मुस्लिम लोकसंख्या जवळपास 30 टक्क्यांहून अधिकने वाढण्याची शक्यता आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्याचा मोठा धोका

मुंबईत 50 टक्के अवैध घुसखोरी ही महिलांच्या देह व्यापारातून होत असल्याचे समोर येत आहे. स्थानिक लोकांची नाराजी वाढत आहे. या अवैध प्रवाशांमुळे येथील राजकीय, सामाजिक वातावरणात मोठा बदल होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अवैध प्रवाशांमुळे लोकसंख्येचे गुणोत्तर प्रमाणच वाढले नाही तर सामाजिक आरोग्य पण धोक्यात आल्याचे समोर येत आहे. या मेट्रोपॉलिटन शहरात तणाव वाढत आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. एकगठ्ठा मतांसाठी या अवैध प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण पुढे येत आहे. एबीपीने याविषयीचे वृत्त दिले आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर