AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने

सध्या सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने
मुंबई लोकल
| Updated on: Jan 14, 2025 | 9:03 AM
Share

Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सध्या सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मोठा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. डोंबिवली स्थानकावर पहाटेच्या वेळेस कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिसमध्ये पोहोचतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

 तोडगा नाहीच

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. दररोज मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.