AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 (ward 124): मविआप्रमाणे एकत्र आलेच तर मात्र राष्ट्रवादीसाठी हा मतदार सोडावा लागणार की, शिवसेना जमवून घेणार?

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 124 मध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारुण खान विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर जोरदार टक्कर देत त्यांनी आपल्या नावाची मोहोर मुंबई महानगरपालिकेवर उमटवली होती.

BMC Election 2022 (ward 124): मविआप्रमाणे एकत्र आलेच तर मात्र राष्ट्रवादीसाठी हा मतदार सोडावा लागणार की, शिवसेना जमवून घेणार?
| Updated on: Jul 25, 2022 | 1:23 PM
Share

मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतील (Mumbai BMC Election 2022) चित्र वेगळं असणार आहे. एकतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) नवा शिंदे गट स्थापन करुन भाजपसोबत हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर नक्कीच होणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला असला तरी, आता भगवा फडकवणार की शिंदे-फडणवीस मिळून कमळ (BJP) फुलवणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल.

आताच्या निवडणुकीत काय होणार

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 124 मध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारुण खान विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर जोरदार टक्कर देत त्यांनी आपल्या नावाची मोहोर मुंबई महानगरपालिकेवर उमटवली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत काय होणार ते सध्याच्या राजकारणावर अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारून खान, शिवसेनेच्या शामली शैलेश तळेकर, भाजपच्या नमिता जीवन किणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रशिदा खलील खोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पना पियूष छेडा यांनीही या निवडणुकीत आपले नशीब अजमावून पाहिले मात्र राष्ट्रवादीच्या ज्योती खान यांनी मुंबई मनपाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.

निवडणुकीतील उमेदवार

कल्पना पियूष छेडा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-848 संजना संजय जाधव (बहुजन समाज पार्टी)-161 ज्योती हारून खान (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)-6686 नमिता जीवन किणी(भारतीय जनता पार्टी)-3906 रशिदा खलील खोत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-846 शेख फरिदा हयात (समाजवादी पार्टी)-62 शेख शमीरा मुख्तार (ऑल इंडिया मजलिस इत्तेहद्दूल मुस्लिमीन)-1017 तळेकर शामली शैलेश (शिवसेना)-3569 कांबळे उज्वला रमेश (रिपब्लिकन सेना)-29 जाधव संजना राजेंद्र (अपक्ष)-57 अॅड. सरिता राऊळ कामत (अपक्ष)-61 तांबे ललिता रोहित (अपक्ष)-2715 वरीलपैकी एकही नाही (NOTA)233

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंतः

रोया पाम रोड व पी/दक्षिम विभागाच्या सामाईक सीमेच्या नाक्यापासून पी/दक्षिण आणि एस विभागाच्या सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडील डोंगरावरील पाऊलवाटेने एस आणि टी विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत,तेथून टी आणि एस विभागाच्य सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे एस व एल विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (युनियन बँक व शिपींग कॉर्पोरेशनची पश्चिम कुंपनभिंत) तेथून उक्त सामाईक सीमेच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे व पश्चिम बाजूने दक्षिणेकडे आणि उत्तरबाजूने पश्चिमेकडे एस व पी दक्षिण विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (रॉयल पाम रोड) तेथून उक्त सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे पी दक्षिण व टी विभागाच्या सामाईक सामाईक रेषेपर्यंत आहे.

पक्षउमेदवार(Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनातळेकर शामली शैलेश
भाजपनमिता जीवन किणी
राष्ट्रवादी काँग्रेस ज्योती हारुण खान ज्योती हारुण खान
काँग्रेसरशिदा खलील खोत
मनसेकल्पना पियूष छेडा
अपक्ष / इतरजाधव संजना राजेंद्र
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.