AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपात्रतेबाबत आधीच ‘मॅच फिक्सिंग’ झालंय, आज फक्त…; संजय राऊतांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा

Sanjay Raut on Shivsena MLA Disqualification Case Final Hearing Result Today and Rahul Narvekar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे वारंवार भाजप आणि शिंदेगटावर टीका करत असतात. पण संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलतावा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. वाचा...

अपात्रतेबाबत आधीच 'मॅच फिक्सिंग' झालंय, आज फक्त...; संजय राऊतांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा
| Updated on: Jan 10, 2024 | 11:50 AM
Share

मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज या प्रकरणी निकालाचं वाचन करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“आजचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग”

जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी दराने कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत तटस्थ तर राहिले पाहिजेत, असं संजय राऊत म्हणालेत.

“आजचा निकाल दिल्लीतून आलेला”

आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्लीतूनच आलेला आहे. आता फक्त शिक्का मारणं बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जाणार आहेत. कोणत्या खात्रीवर त्यांनी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोडशोसाठी दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. कारण त्यांना निर्णय माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकादेशीर आहे. मूळ व्हीप सुनील प्रभू आहेत. शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे मुख्यमंत्री म्हणून त्या सरकारमध्ये वसलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण दिलेलं आहे. राज्यपालांची प्रत्येक कृती आणि कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रात राज्य करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.