AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग
Varsha Gaikwad
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 12:44 PM
Share

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युलाही ठरला आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

वर्षा गायकवाड यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना शाळा सुरू होण्याबाबतची माहिती दिली. मुंबईतील पालिकेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. माझी महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. शाळा सुरू करण्याबाबत ते सकारात्मक आहेत, असं गायकवाड यांनी सांगितलं.

फॉर्म्युला काय?

मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं त्या म्हणाल्या.

सरकारला धोका नाही

विरोधकांकडून पुन्हा सत्तेत येणार असल्याची विधानं केली जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं सरकार बनलं तेव्हा विरोधकांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळण्याची भविष्यवाणी केली होती. पण सरकार अजूनही स्थिर आहे. सरकारला कसलाही धोका नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

ऑक्टोबरमध्ये निवडणुका

दरम्यान, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावेळी मीडियाशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आम्ही दोन पावलं पुढे गेलो आहोत. ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर निवडणूक तयारीला अधिक गती मिळेल, असं भाई जगताप म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं सूचक विधान राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच केलं होतं. त्यानुसार आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. सर्वच्या सर्व 227 जागा आम्ही लढणार आहोत, असं जगताप म्हणाले.

जगताप यांनी यावेळी आरोग्य शिबीरांची गरजही व्यक्त केली. मेडिकल कँम्प ही शहरांची मोठी गरज आहे. दीड ते पावणे दोन कोटी लोकसंख्येचं हे शहर आहे. या शहराला पालिका सर्वच सुविधा पुरवू शकत नाही. काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या सुविधा देत आहोत, असं ते म्हणाले.

बंददाराआड चर्चा करूनही आघाडीची कोंडीच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बंददाराआड चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारणा करण्यात आली असता बंददाराआड अनेकदा चर्चा झाल्या. पण केंद्राकडून महाविकास आघाडीची कोंडीच झाली आहे. केंद्राने राज्याचे 93 हजार कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीत. आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल आम्ही मोदींना केला. पण त्याचंही उत्तर आलं नाही, असं सांगतानाच सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही पाच वर्ष सत्तेत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

संबंधित बातम्या:

Audio Clip : पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप, महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, भाजप कारवाई करणार का?

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ

मोदी माझ्यावर जळतात, रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या

(Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र