Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai Water cut | यानंतर अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दोन्ही ठिकाणी 6 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पाणीपुरवठा खंडित होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
पाणीकपात
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 1:06 PM

मुंबई: आगामी काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशी माहिती दिली आहे. परळ आणि नायगावात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद असेल. या दोन्ही ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते 6 ऑक्टोबरच्या सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

यानंतर अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दोन्ही ठिकाणी 6 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पाणीपुरवठा खंडित होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

पाणीपुरवठा का बंद राहणार?

जलवाहिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात देखभाल दुरुस्तीचे काम केले जाईल. बीएमसीने या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी आवश्यक पाणी ठेवावे असे आवाहन केले आहे.

देखभालीच्या कामामुळे काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत त्याचबरोबर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येईल. लोकांना उत्तम दर्जाचे स्वच्छ पाणी देण्यासाठी हे देखभालीचे काम वेळोवेळी केले जाते, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणीसाठा

पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake ) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाव परिसरात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वैतरणा, तानसासह इतर सर्व तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा (mumbai water supply lake) जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी 3800 दशलक्ष अर्थात 380 कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो.

संबंधित बातम्या:

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मिळतोय युनिव्हर्सल पास, जाणून घ्या फायदे

Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा; Electric Car रॅलीत आदित्य ठाकरेंचं आवाहन

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.