AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी अन् नरेंद्र मोदी यांच्यांत एकदा वादविवाद होऊ द्या, नाना पटोले का म्हणाले?

जसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांना करावे की अजित पवार यांना करावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे मी राजीनामा दिला.

राहुल गांधी अन् नरेंद्र मोदी यांच्यांत एकदा वादविवाद होऊ द्या, नाना पटोले का म्हणाले?
नाना पटोले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 13, 2023 | 5:10 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानीसंदर्भात लोकसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु ते सर्व लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकले. कामकाजातून काढावे असे ते प्रश्न होते का? कोणते प्रश्न कामकाजातून काढले जातात? मोदीजी पंतप्रधान पदावर आहेत. परंतु परवा त्यांनी लोकसभेत छातीठोकपणे भाषण केले. ते त्या पदाला शोभत नाही. मी हे बोललो तर म्हटले जाते की मी नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका करतो. परंतु एकदा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यांत एकवेळा वादविवाद होऊ द्या. मग सर्व जनतेसमोर येईल, पब्लिक सब जानती है, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. टीव्ही ९ मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.

हा विषय पक्षातंर्गत होता

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असते तर सरकार पडले नसते, त्यांनी राजीनामा देण्यास नको होतो. यासंदर्भात आम्हाला विश्वासात घेतले नव्हते, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले होते, त्या प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष म्हणून मला पक्षाने संधी दिली होती.

यामुळे पक्षाने सांगितले तेव्हा मी राजीनामा दिला. हा आमचा पक्षाचा विषय होता. जसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांना करावे की अजित पवार यांना करावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात उद्धव ठाकरे व अजित पवार यांना सांगितले होते, असे नाना पटोले यांनी सांगितले.

…तर सरकार कोसळणार

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्यापासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीत १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास आम्हाला आहे.  त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकारच कोसळणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीत आमचा विजय होणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. आपण आपल्या कारकिर्दीत पक्षाला चौथ्यावरुन दुसऱ्या क्रमांकावर घेऊन आलो, हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून सिद्ध झाले, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...