AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद आता विधानभवनाच्या दारात; वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी निदर्शने

नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलने सुरू असतानाच आता नवी मागणी पुढे आली आहे. (former chief minister vasantrao naik name)

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद आता विधानभवनाच्या दारात; वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी निदर्शने
haribhau rathod
ReporterSameer Bhise
ReporterSameer Bhise | Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई: नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलने सुरू असतानाच आता नवी मागणी पुढे आली आहे. वसंत विचारधारा मंचने नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आज वसंत विचारधारा मंचने विधानभवन परिसरात निदर्शनेही केली. (Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)

वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही निदर्शने करण्यात आली. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली वसंत विचारधारा मंचने आज विधानभवन परिसरात येऊन वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात यावं म्हणून हातात बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी मंचचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव न दिल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ही समाजाची मागणी

आम्ही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. विमानतळाला वसंतरावांचं नाव द्यावं ही समाजाची मागणी आहे. नवी मुंबई बसवण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. ते हरितक्रांतीचे जनक आहेत. त्यामुळे त्यांचं योगदान लक्षात घेऊन सरकारने विमानतळाला त्यांचं नाव दिलं पाहिजे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली.

कुणाच्याही नावाला विरोध नाही

आमचा कुणाच्या नावाला विरोध नाही. या विमानतळाला वसंतरावांचं नाव द्यावं ही आमची मागणी आहे. सरकारने त्याचा निर्णय घ्यायचा आहे. वसंतरावांचा नवी मुंबईशी संबंध आहे. त्यांनी नवी मुंबई उभारली. त्यामुळे विमानतळाला त्यांचंच नाव दिलं पाहिजे, अशी मागणीही राठोड यांनी केली.

वाद काय?

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. तर स्थानिकांनी दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे नामांतराचा वाद चिघळला असून त्यात आता या विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी पुढे आल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. (Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

(Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र