AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील”; योगींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीनं निशाणा साधला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो नाही तर इतर कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील; योगींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीनं निशाणा साधला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 11:30 PM
Share

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावरून दोन्हीकडून टीका करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या दौऱ्यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरवरही टीका केली आहे. गोरखपूर आणि मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक टीका करत ही मुंबई मराठी माणसाची आहे हाच सूर आळवत मुंबईवर पुन्हा एकदा मराठी माणसाचा हक्क कसा आहे तेही सांगितले.

त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो नाही तर इतर कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईची महती सांगताना त्यांनी मराठी माणसाची मुंबई कशी आहे हेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

कारण राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि येथील उद्योग याविषयी टीका केली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई, मुंबई आहे. ती मराठी माणसांची मुंबई आहे.

आणि मुंबईच्या मातीची शानच काही वेगळी आहे. मुंबईची मातीच परिस्पर्शाची माती असल्याचे सांगत अशी मुंबई जगाच्या पाठीवर बनूच शकत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांच्यवर टीका करताना भाजपच्या जुन्या नेत्यांनी मुंबईबद्दल केलेली वक्तव्यामुळे त्यांनी मुंबईवर मराठी माणसांची कसा हक्क आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं