AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांनी निवड समिती जाहीर केलीय. ही समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीची बैठक 6 मे ला होणार होती. पण शरद पवार यांनी याबाबत एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष 'या' दिवशी ठरणार
| Edited By: | Updated on: May 03, 2023 | 5:09 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही केलं जात आहे. कार्यकर्त्यांचा हट्ट पाहता शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. शरद पवार दोन दिवस याबाबत विचार करणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली. पण आता खूप मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवं होतं हे मला जाणवत आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पण विचारुन राजीनामाची घोषणा केली तर विरोध झाला असता, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची नेमकी भूमिका काय?

शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची भूमिका समोर आली आहे. पवारांनी एक खंत व्यक्त केली. “६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“१ मे १९६० रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं 1 मे शी वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं व्यक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो . ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.