AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा राज कधी उघड होणार ? सुनील तटकरे यांनी दिले उत्तर

sunil tatkare | २०१४चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती.

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा राज कधी उघड होणार ? सुनील तटकरे यांनी दिले उत्तर
सुनील तटकरे
| Updated on: Mar 01, 2024 | 12:07 PM
Share

मुंबई, | दि. 1 मार्च 2024 : 2019 चा स्पष्ट कौल भाजप आणि शिवसेना युतीला जनतेने दिला होता. त्यावेळी भाजपला १०६ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत. मग तो कौल का नाकारला गेला, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु जनतेचा कौल नाकारुन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवले होते की ते स्वत: गेले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या ओघात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले सुनील तटकरे

मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक उलथापालथी झाली. आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो. पण वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे. २०१४चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात २०१४पासून झाली. परंतु ४३ आमदार अजितदादांसोबत येतात हे कर्तृत्व आहे. त्यांचावर विश्वास आहे म्हणूनच आहे. त्यांनी असामान्य भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यासोबत गेले.

२०१४पासून भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा पक्षनेतृत्वाचा होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. राष्ट्रवादीत संघर्ष नव्हताच. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. तो केवळ २०१४लाच नव्हे तर २०१६लाही तोच निर्णय झाला होता. मी पक्षातील नेते, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील होते. खाती ठरली होती. पालकमंत्रीपद ठरलं होतं. पण काही कारणाने ते ठरू शकलं नाही

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.