AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे.

VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
ajit pawar
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 2:55 PM
Share

मुंबई: सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी साभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

मास्क लावूच बसा

विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आहे. आपल्या सर्व गोष्टी, व्हिडिओ, ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला प्रक्षेपण केलं जातं. कितीही कुणी प्रयत्न केला तरी संकट काही संपलेलं नाही. आता अजून एक व्हेरिएंट पुढे आला आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तर, सभापती नरहरी झिरवाळ यांनी सर्वांनी मास्क लावण्याच्या सूचना केल्या. बोलताना अडचण येत असेल तरच मास्क काढून ठेवा, अन्यथा मास्क लावूनच सभागृहात बसा, अशा सूचना झिरवाळ यांनी दिल्या.

कोविड मृत्यूंचे प्रमाण घटले

दरम्यान, मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास पाच दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या 9 टक्क्यांनी वाढली. हा आकडा 7,093 पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या 6,481 एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.

धारावी- माहीममध्ये रुग्णसंख्या घटली

मुंबईतील धारावी आणि माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या तीन दिवसात तर माहीममध्ये फक्त 14 रुग्ण आढळून आले आहेत. माहीममध्ये पार पडलेला मेळा आणि चर्चमधील वाढत्या संख्येमुळेही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 15 ते 21 डिसेंबर या सहा दिवसात राज्यातील लसीकरण 24 टक्क्यांपर्यंत घसरले असून हा आकडा 5 लाख 34 हजारांपर्यंत गेला आहे.

संबंधित बातम्या:

Omicron| मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

बचत गटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला सुरुवात

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...