AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख

पालिकेकडून 'आर-मध्य' बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख
नागपुरात आज पाणीबाणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 7:00 AM
Share

दहिसर (Dahisar), बोरिवलीच्या (Borivali) काही भागात 5 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 6 मे रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेकडून ‘आर-मध्य’ बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईनचं काम सुरू असताना ‘आर-मध्य’ विभागातील चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा आणि संपूर्ण बोरिवली पश्चिममध्ये 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 ते रात्री 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. ‘आर उत्तर’ विभागातील एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गाव, कांदरपाडा, लिंक रोड आणि संपूर्ण दहिसर पश्चिम विभागात रात्री 9.40 ते रात्री 11.55 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

राज्यात पाणीटंचाईची भीती

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या केवळ 44 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. मुंबईतील धरणांत 27 टक्के तर ठाणे जिल्ह्यातील धरणांत 45 टक्के पाणीसाठा उरला आहे. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत या साठ्यात आणखी घट झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

2 मार्चला राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा होता. 15 दिवसांपूर्वी राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या पुणे विभागात सध्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी शिल्लक आहे. तापमानवाढीपुढे येत्या काही दिवसांत इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. असं असूनही वितरण व्यवस्थेतील दोषामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरांसह नवी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवतेय.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.