AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख

पालिकेकडून 'आर-मध्य' बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख
नागपुरात आज पाणीबाणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 7:00 AM
Share

दहिसर (Dahisar), बोरिवलीच्या (Borivali) काही भागात 5 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 6 मे रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेकडून ‘आर-मध्य’ बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईनचं काम सुरू असताना ‘आर-मध्य’ विभागातील चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा आणि संपूर्ण बोरिवली पश्चिममध्ये 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 ते रात्री 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. ‘आर उत्तर’ विभागातील एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गाव, कांदरपाडा, लिंक रोड आणि संपूर्ण दहिसर पश्चिम विभागात रात्री 9.40 ते रात्री 11.55 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

राज्यात पाणीटंचाईची भीती

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या केवळ 44 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. मुंबईतील धरणांत 27 टक्के तर ठाणे जिल्ह्यातील धरणांत 45 टक्के पाणीसाठा उरला आहे. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत या साठ्यात आणखी घट झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

2 मार्चला राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा होता. 15 दिवसांपूर्वी राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या पुणे विभागात सध्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी शिल्लक आहे. तापमानवाढीपुढे येत्या काही दिवसांत इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. असं असूनही वितरण व्यवस्थेतील दोषामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरांसह नवी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवतेय.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.