AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा नेत्यांच्या आजवरच्या भूमिकेमुळे समाजाचे नुकसान, आता EWSच्या निर्णयाचे स्वागत करा’

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला | EWS reservation for Maratha community

'मराठा नेत्यांच्या आजवरच्या भूमिकेमुळे समाजाचे नुकसान, आता EWSच्या निर्णयाचे स्वागत करा'
| Updated on: Dec 23, 2020 | 10:42 PM
Share

मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण मराठा समाजाला लागू व्हावे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मात्र, मराठा समाजाच्या नेत्यांना त्याला विरोध केला होता. नेत्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाचे (Maratah Reservation) नुकसान झाले. तेव्हा आता तरी या नेत्यांना राज्य सरकारच्या EWS आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करावे, असे वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केले. (EWS reservation for Maratha community in Education and Jobs)

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनीही राज्य सरकारच्या या निर्णायचे स्वागत करावे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

विनायक मेटेंकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याच्या निर्णयाचे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी स्वागत केले. वराती मागून घोडे असा निर्णय मी म्हणेन. आमची मागणी होती पण सरकारनं उशीरा निर्णय घेतला, असे विनायक मेटे यांनी सांगितले.

तत्पूर्वी मेटे यांनी काँग्रेस पक्षालाही मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. विनायक मेटे यांनी यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मराठा समाज नितीन राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल विनायक मेटे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

मराठा संघटनांची भूमिका काय?

सरकारच्या या निर्णयामुळे मराठा संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे समन्वयक पुण्यात एकत्र जमणार आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.

सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे. तसेच, सरकारच्या या निर्णयामुळे जर कोर्टात सुनावणी सुरु असलेल्या SEBC आरक्षणासंदर्भातील याचिकेवर परिणाम झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जाधव यांनी दिला.

संबंधित बातम्या:

‘EWS आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण खटल्याचा खून’

मराठा समाजाला EWS आरक्षण, संघटना मात्र नाराज, पुढे काय होणार?

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा

(EWS reservation for Maratha community in Education and Jobs)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.