मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट

सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे 'नवरात्री' गिफ्ट
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 5:10 PM

नवी दिल्ली : मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या मागणीला अखेर यश आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. (Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून (21 ऑक्टोबर) सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.

— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020

विशेष म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवासास मुभा दिली आहे.

राज्य सरकारकडून महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. तत्पूर्वी राज्य सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिलं होतं. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार असून, महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नसल्याचंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. (Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

अनलॉकची प्रक्रिया केल्यानंतर अनेक गोष्टी हळूहळू सुरू केल्या आहेत. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरू करण्यात आले. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरू केल्या जात आहेत. आता सिनेमागृहदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉक झाले, तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं वकिलांना ट्रेननं प्रवास करण्याची मुभा दिली होती.

संबंधित बातम्या

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? : सचिन सावंत

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

(Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.