AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राकडून कोकणाला मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

केंद्राकडून कोकणाला मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन
Uddhav Thackeray_Narendra Modi
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 23, 2021 | 5:30 AM
Share

मुंबई : कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मोदींनी फोन करुन राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सकाळपासूनच राज्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची माहिती मराठीत ट्विट करुन दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे.”

“प्रविण दरेकर भरपावसात महाड, माणगाव परिसरात”

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील भरपावसात महाड, माणगाव परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहचले. तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर ते, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडले आहेत. दरेकर म्हणाले, “तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आल्याची माहिती दिलीय. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही.”

“आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत,” अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

हेही वाचा :

चीनमध्ये 1,000 वर्षांनंतर भयंकर पाऊस; 33 मृत्युमुखी, रुग्णालयात शिरले पाणी

रस्त्यावर 6 फूट पाणी, मार्ग बंद, तरीही प्रविण दरेकर भरपावसात माणगावमध्ये, बचाव कार्याचा आढावा

हृदयद्रावक ! पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न, बैलाचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता, पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहा :

PM Narendra Modi call CM Uddhav Thackeray over Kokan flood

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली