शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का? : प्रवीण दरेकर

भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले

शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का? : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 2:47 PM

मुंबई : देशहितासाठी असलेल्या मनसेच्या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणू नये. शिवसेनेने भूमिका स्पष्ट न केल्यास तेही बांगलादेशींना पाठिशी घालत असल्याचं चित्र निर्माण होईल’ असं प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Shivsena) यांनी शिवसेनेला दिलं. मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेने केली होती.

राज ठाकरे देशहितासाठी चांगली भूमिका घेत आहेत. त्यांच्या मोर्चाबाबत प्रचंड उत्साह आहे. भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचाही उल्लेख केला.

‘या मोर्चामुळे शिवसेनेला पोटदुखी होण्याचं काही कारणच नाही. मनसेच्या रॅलीचा उद्देश देशभक्तीने प्रेरित आहे. देशात लपून बसलेल्या घुसखोरांच्या विरोधात आहे. घुसखोरांविरोधात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या भूमिकेला राज ठाकरेंचं समर्थन असेल, तर शिवसेनेला दुःख होण्याचं कारण नाही’ असं म्हणत दरेकरांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

हेही वाचा : अजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव

‘शिवसेनेने मूळ हिंदुत्वाचा विचार कमी केला. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर जी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, ती दिसून येते. म्हणूनच राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत शिवसेना नेते टिप्पणी करत आहेत’ असं दरेकर म्हणाले.

राज ठाकरे आंदोलन करताना जनतेला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पक्षाच्या पलिकडे जाऊन कोणी त्यात सहभागी होणार असेल, तर वाईट वाटायचं कारण नाही. त्यामुळे देशहितासाठी असलेल्या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणू नये. शिवसेनेने भूमिका स्पष्ट न केल्यास तेही बांगलादेशींना पाठिशी घालत असल्याचं चित्र निर्माण होईल’ असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar on Shivsena) दिलं.

याआधी, मनसे नेते अविनाश जाधव यांनीही शिवसेनेला उत्तर दिलं होतं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सध्या शिवसेना नाही, तर अजित पवार सरकार चालवत आहेत. थोड्या दिवसांनी ते शिवसेनाही चालवायला घेतील, राज्य सरकार अजित पवार पुरस्कृत आहे”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली. तसेच, “बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहेत”, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.