AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ

आमचा फोकस महिलांना मदत करण्यावर आहे. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे. महिलांना बस प्रवास मोफत होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. जातीय जनगणना आम्ही करणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

'एक है तो सेफ हैं...', नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ
Rahul Gandhi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 18, 2024 | 11:48 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेत ते महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यवर हल्ला करत आहे. त्याचवेळी सोमवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ हैं…’ या घोषणेचा नवीन अर्थ सांगितला. यावेळी त्यांनी गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्ला केला.

राहुल गांधी यांचे हे प्रश्न

‘एक है तो सेफ हैं…’ म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत. अमित शाह आहे. गौतम अदानी सेफ आहेत. नुकसान कोणाचे होणार आहे तर धारावीचे होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे होणार आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर घोषणा दिली आहे. एक कोण आहे…तर अदानी आहे. सेफ कोण आहे तर अदानी आहे. ही घोषणा गौतम अदानी यांच्यासाठी आहे. संपूर्ण काम एका व्यक्तीच्या मदतीसाठी आहे.

सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या एका व्यक्तीसाठी कामाला लावली आहे. त्याच व्यक्तीला देशाचे एअरपोर्ट दिले जात आहे. त्याच व्यक्तीला देशाची संरक्षण उत्पादन दिले जात आहे. त्यांनाच धारावी दिले गेले आहे. कारण नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे जुने नाते आहे. एका अब्जाधीश यांना १ लाख कोटींचा फायदा देण्यासाठी ही सगळी खटाटोप सुरू आहे.महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातील जनतेला मिळणार की एका व्यक्तीला मिळणार? हा या निवडणुकीचा मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस काय करणार

आमचा फोकस महिलांना मदत करण्यावर आहे. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे. महिलांना बस प्रवास मोफत होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. जातीय जनगणना आम्ही करणार आहे. आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा आम्ही उठवणार आहे. महागाई, बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. २५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे. बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिन्याला देणार आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.