AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 दिवस गूढ, मासं खाताना अडकले अन्… राणीबागेतील शक्ती वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे? माहिती समोर

मुंबईच्या राणीबागेतील शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबर 2025 रोजी मृत्यू झाला, मात्र प्रशासनाने ही बातमी आठ दिवस दडवून ठेवली. यामुळे हलगर्जीपणाचा संशय बळावला आहे. मृत्यूचे कारण आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.

8 दिवस गूढ, मासं खाताना अडकले अन्... राणीबागेतील शक्ती वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे? माहिती समोर
Shakti tiger
| Updated on: Nov 26, 2025 | 12:56 PM
Share

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) शक्ती नावाच्या वाघाचा 17 नोव्हेंबर 2025 रोजी मृत्यू झाला. मात्र प्रशासनाने या वाघाच्या मृत्यूची बातमी आठ दिवस लपवून ठेवल्यामुळे तीव्र संशय व्यक्त होत आहे. या वाघाच्या मृत्यूचे कारण आणि प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. आता याप्रकरणी राणीबाग प्रशासनाचे स्पष्टीकरण समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:15 च्या सुमारास झाला. वाघाला अचानक अपस्माराचे झटके आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबरला झाला असताना ही माहिती 24 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच आठ दिवस प्रसिद्ध करण्यात आली नाही. या विलंबामुळेच त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटलं जात आहे. प्रशासनाने दावा केला की मृत्यूची माहिती 18 नोव्हेंबर रोजी ईमेलद्वारे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (CZA) आणि महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांना कळवण्यात आली होती.

वाघाच्या मृत्यूचे कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, शक्ती वाघाची फुफ्फुसे 90 टक्के खराब झाली होती. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथील पॅथोलॉजी विभागाने प्राथमिक मृत्यूचे कारण ‘Payogranulomatous Pneumonia Resulting in Respiratory Failure’ (श्वसन निकामी होण्यास कारणीभूत असलेला पायोग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया) असे दिले आहे. अंतिम अहवाल आणि नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राकडील अवयवांचे नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप आणि आमदार अजय चौधरी यांनी ‘शक्ती’चा मृत्यू श्वसन नलिकेजवळ हाड अडकल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. मांस खाताना हाड अडकले आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला, असे म्हटलं जात आहे. आमदार अजय चौधरी यांनी आयुक्तांची परवानगी न मिळाल्याने माहिती दडवली गेली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा

प्रथमेश जगताप यांनी प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे शक्तीचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला आहे. उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हा शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आणि माहिती जाहीर न करताच वाघाच्या मृतदेहाची घाईघाईत विल्हेवाट का लावली गेली, असा सवालही विचारला जात आहे. अजय चौधरी यांनी शवविच्छेदन इन कॅमेरा’ (In Camera) झाले का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी राज्याचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी व्याघ्रप्रेमींनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमावी, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली आहे.

शक्ती वाघ हा फेब्रुवारी 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील प्राणिसंग्रहालयातून आणला गेला होता. त्यावेळी तो अंदाजे साडेतीन वर्षांचा होता. तो राणीबागेतील ‘जय’ आणि वाघीण ‘करिश्मा’ यांच्यासोबत राहत होता. या जोडीला जय व रुद्र अशी पिल्ले झाली होती. वाघ गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी होता, असा दावा केला आहे. राणीच्या बागेतील वाघाच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींना धक्का बसला आहे. या मृत्यूच्या सखोल चौकशीतून सत्य कधी बाहेर येणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका