AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टामस्करी थांबवावी, नाही तर कार्यालयं…

सोयाबीन, कापूस उत्पादक आणि जलसमाधी आंदोलनामुळेच त्या ठिकाणी विमा कंपन्याही टाळ्यावर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टामस्करी थांबवावी, नाही तर कार्यालयं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 27, 2022 | 4:31 PM
Share

मुंबईः विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची लावलेली थट्टा असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी त्यांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाची आठवण करुन देत सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही हजारो शेतकरी मुंबईला गेलो.

सोयाबीन, कापूस उत्पादक आणि जलसमाधी आंदोलनामुळेच त्या ठिकाणी विमा कंपन्याही टाळ्यावर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यामुळेच सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असंही त्यांनी सांगितले.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच विमा कंपन्यांना पैसे देण्यास भाग पाडले असंही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जवळपास 2142 कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे मंजूर झाले आहेत.

त्यामध्ये 942 कोटी रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही विमा कंपन्यांकडे 1205 कोटी रुपये अजून बाकी आहे परंतु काही ठिकाणी प्रीमियम पेक्षा सुद्धा कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर 60 रुपये, 70 रुपये आणि 300 रुपये अशी किरकोळ रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर आली आहे.

त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांना त्यांनी इशारा दिला असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घ्या असा सल्लाही त्यांनी विमा कंपन्याना दिला आहे.

नुकसाना भरपाईविषयी त्यांनी विमा कंपन्याना इशारा देत शेतकऱ्यांकडून तुम्ही पुन्हा अर्ज दाखल करुन घ्या आणि 100 टक्के नुकसाना भरपाईची रक्कम जाचक निकषामध्ये न अडकवता ती शेतकऱ्यांना मिळवून द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यामधील जीएसआय कंपनी आहे. ज्या कंपनीचे कार्यालय मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये आहे. मागच्या वर्षी या कंपनीचा ताबा आम्ही अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला होता,

आणि त्यांना पैसै मिळवून दिले होते. त्यामुळे आताही त्यांनी शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई दिली तर मुंबईतील कंपनीचे कार्यालय उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.