AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report |’स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’ यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बिनसतंय? पाहा नेमंक काय?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हत तर ते स्वराज्यरक्षक होते या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे सांगत स्वराज्यरक्षक बिरुदात सर्व जाती-धर्म येतात असा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.

Special Report |'स्वराज्यरक्षक' की 'धर्मवीर' यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बिनसतंय? पाहा नेमंक काय?
| Updated on: Jan 04, 2023 | 9:43 PM
Share

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले. त्यानंतर सत्ताधारी, शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करत त्यांच्यावर टीका केली. या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते पदाचा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करत अजित पवार यांनी माफी मागावी नाही तर राज्यात शिवप्रेमी अजित पवारांना फिरू देणार नाहीत असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर अशा टिल्यांनी मला सांगायचं नाही, त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हत तर ते स्वराज्यरक्षक होते या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे सांगत स्वराज्यरक्षक बिरुदात सर्व जाती-धर्म येतात असा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण आणि विस्तार केला असल्याचे सांगत माझं मत प्रत्येकाला पटावंच असं नाही असा खुलासाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांना सांगितला.

छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणतो काही जण धर्मवीर म्हणतात पण राजे धर्मवीर नव्हते. त्यांनी कधी धर्माचा पुरस्कार केला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितेल.

मी माझी भूमिका मांडली आहे, ज्यांना योग्य वाटते त्यांनी ती स्वीकारा, आणि ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी ती सोडून द्या असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

ज्या लोकांनी आपल्या विरोधात आंदोलन केले आहे. त्यांना हायकमांडचा आदेश होता. त्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. ज्यांनी आंदोलन केले होते, त्यांचा आपल्याला फोन आला होता. तुम्ही काही चुकीचं बोलला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.