AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा विजय’, ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता, अशी भूमिका ऋतुजा लटके यांनी मांडली.

'मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा विजय', ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Nov 06, 2022 | 1:57 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. ऋतुजा यांनी विजयानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच हा विजय म्हणजे आपल्या पतीने केलेल्या कामांची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली. “हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.

“भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचं आवाहन केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केलं? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचं बटण का दाबलं”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.

“माझं पहिलं काम हेच आहे की, रमेश लटके यांची जी अर्धवट कामं राहिली आहेत, त्यांनी ज्यांना कामाचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार. माझी पहिली प्राथमिकता तीच असेल. त्यांचा अंधेरीचा विकास हा ध्यास होता. मीदेखील तितक्याच प्रयत्नाने विकासाचा प्रयत्न करेन”, असं ऋतुजा यांनी सांगितलं.

“मी जनतेचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांचे आभार मानते. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर जाणारच आहे. पण मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानते”, असं ऋतुजा म्हणाल्या.

“ही पोटनिवडणूक आहे. माझ्या पतींचं निधन झालंय. माझं एक दु:ख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली”, असं ऋतुजा म्हणाल्या.

“नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता”, असा टोला ऋतुजा यांनी लगावला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.