AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कायापालट करणार; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषण मुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावेत अशा सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कायापालट करणार; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 11, 2022 | 6:36 PM
Share

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा (Sanjay Gandhi National Park) चेहरा मोहरा बदलून या ठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) तातडीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तयार करावा असे निर्देश वन विभागाला (Forest Department) दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जगातील विविध उद्यानामधील पर्यटकांना आकर्षित करणारे पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मुंबईच्या नागरिकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी निर्माण करण्यात यावेत अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

दुर्मिळ प्राणी-पक्षी उद्यानात

विविध जातींच्या सापांचे संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या, पांढरा सिंह, असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी तसेच पक्षी या उद्यानात आणावेत तसेच वाघांची, बिबट्याच्या सफारीचे उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रदूषण मुक्तीसाठी इलेक्ट्रीक वाहने

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषण मुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावेत अशा सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदींची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Nalasopara: ऑफिसात घुसला साप, कॅबिनेमध्ये साप पाहून एकच थरकाप! पाहा CCTV Video

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली