AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना माहीत, संजय राऊतांचा घोडेबाजारीचा आरोप संजय मामा शिंदेंनी फेटाळला

काही जे घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते विकले गेले. जास्त बोली लागली, असे मला वाटते. त्यामुळे आमचा पराभव झाला. अपक्षांची सहा मते होती, ती आम्हाला मिळाली नाहीत. मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांची मते फुटली नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

Rajya Sabha Election Results 2022 : मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना माहीत, संजय राऊतांचा घोडेबाजारीचा आरोप संजय मामा शिंदेंनी फेटाळला
अपक्ष आमदार संजय मामा शिंदेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 11, 2022 | 12:14 PM
Share

सोलापूर : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अपक्षांना ज्या सूचना केल्या होत्या, त्याचे पालन करून मतदान केले. शिवसेनेच्या कोट्यातून मतदान करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेचे अनिल देसाई आल्याशिवाय आम्ही अपक्ष मतदान केले नाही, असे स्पष्टीकरण करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे (Sanjay MaMa Shinde) यांनी दिले आहे. ते सोलापुरात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना (Uddhav Thackeray) माहीत, असे पलटवार त्यांनी केला आहे. दरम्यान, पराभव का झाला याबद्दल वरिष्ठ नेते मंडळीच सांगतील. आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केल्याचे स्पष्टीकरण संजय मामा शिंदे यांनी दिले आहे.

‘सूचनांचे पालन केले’

मी एकटाच अपक्ष आहे असे नाही. अनेक अपक्ष आमदार आहेत. माझ्या नावाची चर्चा तर होतेच आहे. मात्र दोन्ही बाजूने होतच राहणार, असे सांगताना महाविकास आघाडीत अपक्षांकडून मत फुटण्याचा प्रकार घडलेला नाही, असे संजय मामा शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीकडून ज्या ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचे पालन केले. कोणालाही संपर्क करू नका, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पालन केले. मुंबईला गेलो नव्हतो, तेव्हाही माझ्या नावाची चर्चा होत होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

काही जे घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते विकले गेले. जास्त बोली लागली, असे मला वाटते. त्यामुळे आमचा पराभव झाला. अपक्षांची सहा मते होती, ती आम्हाला मिळाली नाहीत. मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांची मते फुटली नाहीत. आम्ही कोणत्याही व्यापारात सहभागी झालो नाही. शब्द देऊन ज्यांनी दगाबाजी केली, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले. हरभरे टाकल्यावर ते कुठेही जातात, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नावाचा उल्लेख करत अपक्षांवर टीका केली.

संजय राऊतांचा अपक्षांवर आरोप

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.