AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका

Sanjay Raut | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्गी आयोगाचा मसूदा कॅबिनेटने मंजूर केला आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने सोडवावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका
| Updated on: Feb 20, 2024 | 10:32 AM
Share

मुंबई | 20 February 2024 : मराठा आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारने आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. तर विरोधी पक्षांनी, महाविकास आघाडीमध्ये पण या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. घटकपक्षांची बैठक, चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा समाजाचा प्रश्न एकमताने सोडवावा अशी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, हे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजपवर निशाणा

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला. भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. देशात इव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. जे सरकार विरोधात लढतात त्यांना तपास यंत्रणाचा वापर करून त्रास दिला जात असल्याची आरोप त्यांनी केला. विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलनासंदर्भात लवकरच निर्णय

शेतकरी आंदोलन उद्धव ठाकरे चंदीगडला जाण्याची चर्चा असल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मी माहिती घेतली, याविषयी उद्धव ठाकरे यांना सांगेल नंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले. यापूर्वी शेतकरी आंदोलनावरुन केंद्रावर टीका करण्यात आली होती. जर कोणी सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा प्रकारे धमक्या देत असेल तर तर राज्याला दुबळा गृहमंत्री मिळाला असल्याचा आरोप त्यांनी निलेश राणे यांच्या धमकीप्रकरणात केला.

यामुळे फोडाफोडी

भाजप स्वबळावर सत्तेत आली नाही तर मित्र पक्षांचं महत्त्व वाढेल म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेतलं जात आहे. दहशतीने बंदूक दाखवून सोबत घेतलं जात आहे त्यांचे कोणी मित्र नाही. भाजप सर्वाधिक जागा लढणार. त्यासाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलणारे पक्ष फोडले, अशी टीका त्यांनी केली. विशेष अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या टीकेला धार चढली आहे. या अधिवेशनात सरकारच्या निर्णयानंतर विरोधक काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.