AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका

Sanjay Raut | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्गी आयोगाचा मसूदा कॅबिनेटने मंजूर केला आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने सोडवावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका
| Updated on: Feb 20, 2024 | 10:32 AM
Share

मुंबई | 20 February 2024 : मराठा आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारने आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. तर विरोधी पक्षांनी, महाविकास आघाडीमध्ये पण या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. घटकपक्षांची बैठक, चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा समाजाचा प्रश्न एकमताने सोडवावा अशी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, हे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजपवर निशाणा

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला. भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. देशात इव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. जे सरकार विरोधात लढतात त्यांना तपास यंत्रणाचा वापर करून त्रास दिला जात असल्याची आरोप त्यांनी केला. विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलनासंदर्भात लवकरच निर्णय

शेतकरी आंदोलन उद्धव ठाकरे चंदीगडला जाण्याची चर्चा असल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मी माहिती घेतली, याविषयी उद्धव ठाकरे यांना सांगेल नंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले. यापूर्वी शेतकरी आंदोलनावरुन केंद्रावर टीका करण्यात आली होती. जर कोणी सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा प्रकारे धमक्या देत असेल तर तर राज्याला दुबळा गृहमंत्री मिळाला असल्याचा आरोप त्यांनी निलेश राणे यांच्या धमकीप्रकरणात केला.

यामुळे फोडाफोडी

भाजप स्वबळावर सत्तेत आली नाही तर मित्र पक्षांचं महत्त्व वाढेल म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेतलं जात आहे. दहशतीने बंदूक दाखवून सोबत घेतलं जात आहे त्यांचे कोणी मित्र नाही. भाजप सर्वाधिक जागा लढणार. त्यासाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलणारे पक्ष फोडले, अशी टीका त्यांनी केली. विशेष अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या टीकेला धार चढली आहे. या अधिवेशनात सरकारच्या निर्णयानंतर विरोधक काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.