AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 13, 2023 | 10:38 AM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत. या नोटिशीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. राहुल गांधी यांना नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकभावनेचा हक्कभंग केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बलोताना केला.

राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं कारण नाही. लोकसभेत त्यांनी उद्योगपतीसंबंधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं उत्तर मोदींनी द्यायला हवं होतं. मोदींना विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळाली होती. खरं तर पंतप्रधानांनीच हक्कभंग केला. या जनतेच्या भावनांचा. लोकसभेचा, असं संजय राऊत म्हणाले.

यालाच हुकूमशाही म्हणतात

राहुल गांधी आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याची संधी होती. पण त्यांनी ती घेतली नाही. हा पलायनवाद आहे. हा पळपुटेपणा आहे. तुम्ही संसदेच्या नियमांचा आधार घेऊन सदस्यांना नोटीसा पाठवत आहात यालाच हुकूमशाही म्हणतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

मुंबई, ठाणे आम्हीच जिंकू

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या. 150 काय ते 450चा आकडा देऊ शकतात.

पण मुंबई आणि ठाणे पालिका या पुन्हा शिवसेनेच्या भगव्याखालीच येतील. ज्या राज्याचा मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये येत नाही. त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजप कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी यांना नोटीस कशासाठी?

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरली होती. तसेच दिशाभूल करणारे तथ्य मांडले होते. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईमेलवरून नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या भाषणातील ती विधाने संसदेच्या कार्यवाहितून काढण्याची विनंती केली आहे. नियम 380 नुसार कामकाजातून ती विधाने काढावीत असं जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.

अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवारीनंतरच बाहेरच्या देशांकडून अदानी यांना कंत्राट मिळत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी किती वेळा अदानी किंवा त्यांच्या कंपनीचे लोक उपस्थित होते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. त्यालाच आक्षेप घेण्यात आला आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड