AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 13, 2023 | 10:38 AM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत. या नोटिशीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. राहुल गांधी यांना नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकभावनेचा हक्कभंग केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बलोताना केला.

राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं कारण नाही. लोकसभेत त्यांनी उद्योगपतीसंबंधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं उत्तर मोदींनी द्यायला हवं होतं. मोदींना विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळाली होती. खरं तर पंतप्रधानांनीच हक्कभंग केला. या जनतेच्या भावनांचा. लोकसभेचा, असं संजय राऊत म्हणाले.

यालाच हुकूमशाही म्हणतात

राहुल गांधी आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याची संधी होती. पण त्यांनी ती घेतली नाही. हा पलायनवाद आहे. हा पळपुटेपणा आहे. तुम्ही संसदेच्या नियमांचा आधार घेऊन सदस्यांना नोटीसा पाठवत आहात यालाच हुकूमशाही म्हणतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

मुंबई, ठाणे आम्हीच जिंकू

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या. 150 काय ते 450चा आकडा देऊ शकतात.

पण मुंबई आणि ठाणे पालिका या पुन्हा शिवसेनेच्या भगव्याखालीच येतील. ज्या राज्याचा मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये येत नाही. त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजप कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी यांना नोटीस कशासाठी?

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरली होती. तसेच दिशाभूल करणारे तथ्य मांडले होते. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईमेलवरून नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या भाषणातील ती विधाने संसदेच्या कार्यवाहितून काढण्याची विनंती केली आहे. नियम 380 नुसार कामकाजातून ती विधाने काढावीत असं जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.

अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवारीनंतरच बाहेरच्या देशांकडून अदानी यांना कंत्राट मिळत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी किती वेळा अदानी किंवा त्यांच्या कंपनीचे लोक उपस्थित होते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. त्यालाच आक्षेप घेण्यात आला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...