AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय शिंदेची हत्या केली, आता कुठे होते सिंघम? संजय राऊतांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याला लाभलेले तीन-तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला आहे.

अक्षय शिंदेची हत्या केली, आता कुठे होते सिंघम? संजय राऊतांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
संजय राऊत, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Tv9
| Updated on: Oct 13, 2024 | 11:09 AM
Share

राज्याला लाभलेले तीन-तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. अभिनेता सलमान खानशी असलेली मैत्री बाबा सिद्दिकी यांना भोवली असावी, अशी चर्चा आहे. त्यात सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगशीही कनेक्शन असल्याचं म्हटलं जातंय.

याविषयी संजय राऊत म्हणाले, “प्रश्न एसआरचा असेल किंवा फिल्मी कलाकारांशी मैत्रीचा असेल किंवा अन्य काही असेल. पण मुंबईत हत्या झाली आहे ना. म्हणजे तुम्ही कायदा-सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहात. या राज्यामध्ये गुंडांचीही अशाप्रकारे हत्या होता कामा नये. तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केली ना, पोलिसांनी. सिंघम ना. मग सिंघम अशावेळी कुठे असतात. हे जे तीन-तीन सिंघम महाराष्ट्राला लाभले आहेत. एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम. मग ते तीन-तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलंत आणि स्वत:ला सिंघम म्हणून घोषित केलंत. आता तुम्हाला काय राष्ट्रपतींनी परमवीर चक्र द्यायचा का? राज्यपालांनी शिफारस करावी की या तीन सिंघमना परमवीर चक्र द्या म्हणून.”

“एकनाथ शिंदे यांचा पोलीस खात्यातील हस्तक्षेप आहे. गुंड टोळी चालवावी असं पोलीस दल हाताळत आहेत. फडणवीस हतबल आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. गुंड टोळ्या जशा चालवल्या जातात, तसं शिंदे पोलिसांचा वापर करत आहे. दोन महिन्यात या खाकी टोळ्यांचा बंदोबस्त केला जाईल. मोदी आणि शाह तुम्हाला हंटर घेऊन पळवत आहे. तुम्ही पळत आहात. चोर पोलीस खेळ सुरू आहे. जनता त्यांना फटकावणार आहे. आमच्यासाठी कालची घटना दुर्देवी आहे. कधीकाळी बाबा सिद्दिकी आमचे सहकारी होते. मुंबईत पूर्वी गँगवार होता. तो खत्म झाला. आजचा गँगवॉर सरकारमध्ये आहे. ज्या पद्धतीने गृहमंत्रालय चाललंय हे निष्क्रीय आणि बदनाम गृहमंत्रालय आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक