AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय; मोर्चा निघण्यापूर्वीच संजय राऊत यांचा हल्लाबोल

ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चे पाहिले आहेत. ती पिढी अजूनही आहे. त्यांना या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमाने भारावलेले होते.

शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय; मोर्चा निघण्यापूर्वीच संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय; मोर्चा निघण्यापूर्वीच संजय राऊत यांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 17, 2022 | 10:17 AM
Share

मुंबई: महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने आज विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. थोड्याच वेळात हा मोर्चा भायखळा येथून निघणार आहे. या मोर्चात तब्बल दोन लाख लोक सहभागी होणार असून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील मोर्चांची आठवण व्हावी असा हा मोर्चा असणार आहे. खुद्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्याचं सुतोवाच केलं आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मोर्चाला निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला. शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलं गेलं आहे. त्यामुळेच ते महापुरुषांचा अवमान सहन करत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

आजच्या मोर्चातून घणाघात तर बसेलच. पण घणाघात होणार आहे या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले आहेत. मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली गेली. 13 अटी शर्ती लादल्या. महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे. तुम्ही त्याला अटी घालता? हे बोलू नका. ते बोलू नका सांगता. हे करू नका. ते करू नका सांगता. आता भाषणही तुम्हीच लिहून द्या. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून देता तसं विरोधी पक्षाला लिहून द्या. काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. हे अटीत आहे. पण आमचा कुणी आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील तर त्यांनी मोर्चात सामील व्हावं. त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्यात दबलं गेलं. चिरडलं गेलंय, अशी टीका करतानाच आजचा मोर्चा प्रचंड आणि अतिविराट असाच निघेल, असं त्यांनी सांगितलं.

ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चे पाहिले आहेत. ती पिढी अजूनही आहे. त्यांना या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमाने भारावलेले होते आणि आताही तसाच मोर्चा असेल. हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे, असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही लाचार आहात. मिंधे आहात म्हणून तुम्ही महापुरुषांचा अपमान सहन करत आहात. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाविरोधात लढत आहोत, असंही ते म्हणाले.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.