Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंकडून योगींचं अभिनंदन, तर राऊत म्हणतात; ही तर भोंगेबाजी, त्यांचं मत परिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय!

उत्तर प्रदेशातील सरकारने लाऊडस्पीकरबाबत काही निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं पालनं करण्यासाठीचा हा निर्णय आहे.

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंकडून योगींचं अभिनंदन, तर राऊत म्हणतात; ही तर भोंगेबाजी, त्यांचं मत परिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय!
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:34 AM

मुंबई: भोंग्यांबाबत कोर्टाची जी भूमिका आहे. तीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार (maharashtra government) नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं. भोंग्यांचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही राजकीय भोंगेबाजी आहे, असं सांगतानाच आता योगी कोण? भोगी कोण?, हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्याने त्यावर पीएचडी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर नाव न घेता केली. महाराष्ट्रात अनेक सभा होतात. राष्ट्रवादीची (ncp) कोल्हापुरात सर्वात मोठी सभा झाली. ती सर्वांनीच पाहिली. महाराष्ट्राला सभेचं वावडं आहे का? त्या दिवशी सहा सभा आहेत. अटी शर्तीचं मला माहीत नाही. त्या त्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतात, असंही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

उत्तर प्रदेशातील सरकारने लाऊडस्पीकरबाबत काही निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं पालनं करण्यासाठीचा हा निर्णय आहे. आम्ही तेच म्हटलं. त्यामुळे गृहमंत्र्यांनी सर्वांना बोलावलं होतं. पण भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला. याचा अर्थ तुम्ही राजकारण करत आहात. तुम्हाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे. तुमची मर्जी. लाऊडस्पीकरबाबत एक राष्ट्रीय धोरण तयार केलं पाहिजे. ते लागू व्हावं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर पालन केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

आम्हालाही स्वाभिमान आहे

यावेळी पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोले लगावले. ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही द्वेष पूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. पंतप्रधानांना सामनातून लक्ष्य केलं नाही. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. ते देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही. त्याबाबत संवेदशनशील असलं पाहिजे. पण दुर्देवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवला आहे. ते अग्रलेखात छापलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

भागवातांचं समर्थन

कोणताही समाज हिंसेचा सहारा घेत असेल तर समाज अधोगतीला जातो या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचं त्यांनी समर्थन केलं. भागवतांचं अभिनंदन करतो. त्यांनी हा विषय पुढे आणला. देशात त्यावर विचार व्हावा. कोणताही समाज हिंसेचं अवलंब करत असेल तर तो अधोगतीला जातो. त्याचं स्वागत व्हायला हवं. त्यावर मंथन व्हावं, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.