AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकारण तापलं; खाते वाटपावर काय म्हणाले संजय शिरसाट?

Sanjay Shirsat on Cabinet Expansion : राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तर त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. पण त्यात अजून गृह खात्याचा ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे.

Sanjay Shirsat : हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकारण तापलं; खाते वाटपावर काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट
| Updated on: Dec 10, 2024 | 4:02 PM
Share

राज्यात महायुतीने बहुमताची लाट आणली. या लाटेत महाविकास आघाडी कुठल्या कुठे वाहून गेली. पण महायुतीला सत्ता स्थापन्याला बराच मुहूर्त लागला. 10 दिवसांनी महायुतीची सत्ता राज्यात आली. देवेंद्र फ़डणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्री पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे. चर्चाच नाही तर अनेक ठिकाणी मोठं-मोठाली बॅनर, पोस्टर्स लागली आहेत. पण खरा पेच हा गृह खात्याचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी गृह खात्याचा ट्विस्ट येणार असल्याचा दावा अनेकजण करत आहे.

आता विस्तार करावाच लागेल

राज्यमंत्री मंडळाची यादी दिलीत गेली की नाही याबद्दल कल्पना नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता विस्तार हा करावाच लागेल, असे वक्तव्य शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी केल आहे. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी या विस्तार होणार अशी माहिती आहे आणि दोन ते तीन दिवसांमध्ये विस्तार होईल असं समजत आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.

खाते वाटपाची चर्चा तर होणारच

खाते वाटप हा महायुतीमधील कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे ते गृहखात्यासाठी अजूनही आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर सुद्धा संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलाही घोडा अडलेला नाही, बरीच मोठी प्रोसिजर, प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले. कुणाला कुठलं खातं द्यायचं, याबद्दल चर्चा तर करावीच लागणार असे सांगत त्यांनी पत्ता उघड केला. महायुतीला मोठे यश मिळाल्याने मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या पण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले.

दिल्लीतील बैठक राहुल गांधींविरोधात

दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी जी बैठक होते ती ईव्हीएम बाबत होत नाहीये तर ती राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठीची बैठक असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. राहुल गांधीवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. राज्यात जे काही घडलं, लोकसभेत जो काही पराभव झाला यानंतर इंडिया आघाडीला एक नव्या नेतृत्वाची गरज आहे आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जाईल असं वाटतंय, असे ते म्हणाले. ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करून विरोधकांना काही मिळणार नाहीये केवळ त्यांच्या वेळ जाणार आहे असा टोला त्यांनी हाणला.

अनेकजण अजितदादांकडे येणार

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला आता संजय राऊत शरद पवार यांना पक्ष संपवण्यासाठी कदाचित शरद पवार यांची भेट घेतील आणि हिंदुत्व बद्दल बोलण्याचा संजय राऊत यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.

जयंत पाटील हे महायुतीमध्ये येऊ शकतात हे भाषण आम्ही सहा महिन्यापूर्वीच केलं होतं , विधानसभा निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातले बरेचसे आमदार राष्ट्रवादी सोडून अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मर्ज होण्यासाठी इच्छुक असल्याचे सध्या दिसते आणि ते लवकरच होईल असं वाटत आहे, असे शिरसाट म्हणाले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.