AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मात्र जनतेने त्यांना घाम फोडला”; सत्यजित तांबेंच्या विजयावर शुभांगी पाटील बोलल्या…

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांची ही लढत असली तरी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे काही जण म्हणत होते, मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना जनतेने घाम फोडला होता असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

मात्र जनतेने त्यांना घाम फोडला; सत्यजित तांबेंच्या विजयावर शुभांगी पाटील बोलल्या...
| Updated on: Feb 02, 2023 | 11:18 PM
Share

नाशिकः राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला असला तरी साऱ्या राज्याचे लक्ष नाशिक शिक्षक मतदार संघाकडे होते. त्यातच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांच्यामुळे नाशिकच्या जागेविषयी आता आणखी उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या विरोधात लढलेल्या शुभांगी पाटील यांनी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला आहे असा गंभीर आरोप शुभांगी पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता आणखी नाशिक मतदार संघाकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

शुभांगी पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांच्यावर त्यांनी गंभीर टीका आणि आरोप केले आहे.

ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असं म्हणत त्यांनी सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्याचमुळे त्यांनी ही निवडणूक मी लढत नव्हती तर जनतेने हातात घेतली होती असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

शुभांगी पाटील यांनी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच बरोबर सत्यजित तांबे यांना राजकीय वारसा आहे.

त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवणे सोपे झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर आपल्याला कोणताही राजकीय वारसा नसतानाही मी ही निवडणूक लढली आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

या निकालात शुभांगी पाटील यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी म्हटले आहे की, आता माझी खरी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे उद्यापासूनच माझी खरी लढाई सुरु करायची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शुभांगी पाटील यांनी या निवडणुकीमध्ये मी पराभूत झाले असले तरी आता आता मला शिक्षकांसाठी मोठे आंदोलन करायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांची ही लढत असली तरी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे काही जण म्हणत होते, मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना जनतेने घाम फोडला होता असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

या निवडणुकीत मी पराभूत झाले असले तरी मला माझ्या जनतेचा कौल मान्य आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. आपण पहिल्यांचा उभा राहूनही मला यावेळी 35 हजार मतं पडली आहेत. त्यामुळे ही मतं विकली गेली नव्हती असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....