AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : मराठा आरक्षणावर शरद पवार यांचा नवा फॉर्म्युला, काय आहे नवा फॉर्म्युला?; पेच सुटणार?

काही लोकांना वाटतं शिवसेनेचं काय झालं? इलेक्शन कमिशनला ज्या सूचना सरकारने दिल्या तसा निर्णय त्यांनी दिला, हे लोकांच्या मनात आहे. आता नवीन लोकांना प्रोत्साहीत करण्याची संधी मिळाली आहे. अशा संकटांच्या काळात जे उभे राहिले ते खरे आहेत.

Sharad Pawar : मराठा आरक्षणावर शरद पवार यांचा नवा फॉर्म्युला, काय आहे नवा फॉर्म्युला?; पेच सुटणार?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2023 | 7:01 AM
Share

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा पेच अजूनही सुटलेला नाही. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. दुसरीकडे राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध केला आहे. राज्यात आरक्षणावर या सर्व गोष्टी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणावर नवा फॉर्म्युला सूचवला आहे. राज्य सरकार का फॉर्म्युला स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर 16 टक्के आरक्षण अधिक वाढवलं तर 50 टक्के अधिक 16 टक्के होऊन 66 टक्के होईल आणि त्यात सर्व प्रश्न सुटतील, असा फॉर्म्युला शरद पवार यांनी सूचवला आहे. 50 टक्क्यांवर आरक्षण जाऊ नये ही गोष्ट खरी आहे. कोर्टाचा तसा निकाल आहे. पण तामिळनाडू सरकारने हे बंधंन 74 टक्के करून घेतलं आणि हे कोर्टात टिकलं, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.

मग ते का करू शकत नाही?

काही निर्णय केंद्राने आता घेतले. कोर्टाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिला आणि त्याच्या नंतर त्यांनी कायदा बदलला. केंद्र सरकार हे करू शकतात तर 14 ते 16 टक्के आरक्षण वाढवून निकाल देऊन का टाकत नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला. जो गरीब माणूस आहे त्याच्या ताटातली भाकरी काढून का घेता? याचं काढून घ्या, त्याला काढून द्या याला काही अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

चिन्ह महत्त्वाचं नसतं

यावेळी शरद पवार यांनी निवडणूक चिन्हावरूनही थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोग आणि त्यासंबंधी वृत्तपत्रामध्ये अनेकांचे येणारे स्टेटमेंट याची चर्चा होत आहे. 1967 साली मी काँग्रेसकडून निवडणूक लढलो. माझ्या आयुष्यात सहा निवडणुकीला वेगवेगळी चिन्ह घेऊन मी लढलो. सातत्याने एक ओळ सांगितली जाते, ती म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळेल.

त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल होते. मात्र काळजी करु नका. आपण लोकांमध्ये राहिलो तर चिन्ह आणि नाव महत्वाचं नसतं. त्याच्यावर आपण मात करू शकतो, असं सांगतानाच इलेक्शन कमिशनवर टीका टिप्पणी करू नका, ते काही निर्णय देतील तो अंतिम आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...