AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन, नेमकी चर्चा काय?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात नुकतंच फोनवर संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन, नेमकी चर्चा काय?
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 6:39 PM
Share

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे नुकतंच विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे नाशिकमध्ये या निवडणुकीदरम्यान ज्या घडामोडी घडल्या ते पाहता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडले की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. विशेष म्हणजे काही नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात बोलत आहेत. हे नेते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याबाजूने आहेत. दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनीदेखील काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून नाना पटोलेंची तक्रार केलीय. या सगळ्या घडामोडींनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात नुकतंच फोनवर संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना फोन करण्यामागील कारण म्हणजे पुण्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक.

विशेष म्हणजे पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यात पोटनिवडणुकीबद्दल उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करण्याबद्दलची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची माहिती समोर आलीय.

पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते कामाला लागतील, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे फोनवर नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वतीने कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलाय. विशेष म्हणजे त्याआधी गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीचा उमेदवार कोणाला जाहीर करावं, याबाबतचं चर्चासत्र सुरु होतं. या दरम्यान काल उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.

“कसबा पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत आपण महाविकास आघाडी म्हणून सर्व एकत्रित काम करु. ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी काम करतील”, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

नाना पटोले सातत्याने महाविकास आघाडीच्या संपर्कात

या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. भाजपच्या विरोधात एकत्र लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षांनी निर्धार केला आहे. त्यामुळे तीनही महत्त्वाचे पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत.

काँग्रेसकडून कसबा पेठसाठी उमेदवार जाहीर

दरम्यान, काँग्रेसकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. रवींद्र यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.