AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पोलीस सुरक्षा सोडून मैदानात या, कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा हे…’, ठाकरेंचं ओपन चॅलेंज

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाबाबत दिलेल्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप आहे. ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेऊन निकालावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस सुरक्षा सोडून समोर येण्याचं चॅलेंज दिलं आहे.

'पोलीस सुरक्षा सोडून मैदानात या, कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा हे...', ठाकरेंचं ओपन चॅलेंज
| Updated on: Jan 16, 2024 | 8:15 PM
Share

मुंबई | 16 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेला निकाल कायदेशीररित्या कसा चुकीचा आहे, याचं विश्लेषण असीम सरोदे यांनी केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. परब यांनी यावेळी शिवसेनेच्या 2013च्या प्रतिनिधी सभेचा थेट व्हिडीओच दाखवला. या प्रतिनिधी सभेत राहुल नार्वेकर हे देखील दिसले. यावेळी मंजूर करण्यात आलेल्या सहा ठरावांची अनिल परब यांनी माहिती दिली. अनिल परब यांच्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांना पोलीस सुरक्षा सोडून जनतेच्या समोर येण्याचं चॅलेंज दिलं.

“माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मीही एक पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शिवसेना तुम्ही विकली असाल ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे शिवसैनिक आहे. आज लाखो शिवसैनिक माझ्यासोबत कसे?”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

“तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का? गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार? म्हणजे राजकारणात. एकूणच जी काही थट्टा सुरू आहे. घटना नाही, घटना नाही… हे काय आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का?’

“अनिल आणि असीम मी म्हणतो बरोबर की चूक ते सांगा. निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. १९ लाख ४१ हजार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का? एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. १९ लाख ४१ हजार इनटू आम्हाला द्या. हा मोठा घोटाळा आहे. शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. ते काही दोन नंबरचे नाही. ईडी त्यांचे नोकर आहे. उघड बोलतो. काय करणार आहेत. बघून घ्याल तुम्ही. मला काय चिंता. मी मुद्दाम पीसी घेतली. २०१८ रोजी इथेच शेवटची निवडणूक झाली होती. २०१३ मध्ये कोण कोण होते पाहिले. राम राम गंगारामही होते त्यात”, असा टोला ठाकरेंनी लगावला.

‘कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते गंभीर’

“नालायक लोक घेऊन गिळायला निघाला. आज ठिक आहे. उद्या बघून घ्या. गिळल्यानंतर २४ तासाने काय होणार. काही लोक म्हणतात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर… मला सत्तेचा मोह नाही. मी कायदा पाहत नाही. मी दिला राजीनामा… कोर्टाने म्हटलं तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं. पण कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते गंभीर आहे. अधिवेशन बोलावलं ते असंवैधानिक होतं. म्हणजे सरकारच असंवैधानिक होतं. कोश्यारी त्या कटात सहभागी झाले. ही फक्त शिवसेनेची लढाई नाही. उद्धव ठाकरे यांची नाही. या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही याची लढाई. सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व राहणार की नाही की त्याच्या डोक्यावर लवाद बसेल याची ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायाचा की या लबाडाचा मानायचा हे महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.