AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कंगनाविरोधात शिवसेनेचे आंदोलन; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून कंगनाविरोधात आंदोलन करण्यात आले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईत कंगनाविरोधात शिवसेनेचे आंदोलन; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 12:24 PM
Share

मुंबई – ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात अनेक ठीकाणी  आंदोलने होत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. कंगनाने केवळ देशाचाच नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे कंगनाने देशाची माफी मागावी अशी मागणी यावेळी संतप्त शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली.

कंगनाविरोधात स्वाक्षरी मोहीम

दरम्यान दुसरीकडे शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने बोरिवली रेल्वे स्टेशनबाहेर कंगनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच तिला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे  आंदोलन करण्यात आले.

संजय राऊत यांचीही टीका 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील या वादग्रस्त वक्तव्यावरून कंगनावर जोरादार हल्लाबोल केला होता. कंगनाने देशाचा अपमान केला आहे, तिने देशाची माफी मागणी असे ते म्हणाले होते. तसेच तिचे सर्व पुरस्कार काढून घ्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

VIDEO: तोंडाला रुमाल, हातात काठ्या, शेकडो तरुण रस्त्यावर; अमरावतीत जमावाकडून प्रचंड दगडफेक

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड

Follow Us
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना..;जे. पी. नड्डा यांची विधानसभेत टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना..;जे. पी. नड्डा यांची विधानसभेत टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.