AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायन पूल बंदचा फटका, मुंबईकरांना वाहतूक कोडींचा ताप, वाहनांच्या लांब, लांब रांगा

Sion Railway Over Bridge: वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे. चार भागांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. हा प्रकार दोन वर्ष राहणार आहे. त्यामुळे या भागांत राहणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच ताप होणार आहे.

सायन पूल बंदचा फटका, मुंबईकरांना वाहतूक कोडींचा ताप, वाहनांच्या लांब, लांब रांगा
mumbai traffic jam due to Sion bridge
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 02, 2024 | 11:55 AM
Share

Sion Railway Over Bridge: सायन स्थानकातील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद करण्यात आला. हा पूल सर्व वाहनांसाठी पुढील दोन वर्ष आता बंद करण्यात आलेला आहे. त्याचे पडसाद उमटत लागले आहेत. यामुळे मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घाटकोपरपासून सायन चुनाभट्टीपर्यंत नियमित वाहतूक ठप्प होत आहे. सायन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी खर्च येणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे. चार भागांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. हा प्रकार दोन वर्ष राहणार आहे. त्यामुळे या भागांत राहणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच ताप होणार आहे.

पर्यायी मार्ग ठप्प

सायन आरोब बंद झाल्याने मुंबईच्या बीकेसी कनेक्टर या पर्यायी मार्गाला निवडले जात आहे. परंतु ट्रॅफिक चेंबूरच्या सुमन नगर जंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी संथ गतीने जात आहे. कारण या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास साडेचार किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली आहे. 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 40 ते 50 मिनिटांचा वेळ लागत आहे. वेस्टन एक्सप्रेस हायवेवर होत असलेल्या वाहतूक कोंडीप्रमाणेच आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा वाहतूक कोंडीचा नवीन अड्डा बनलाय का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

ठाण्यात कंटेनर पलटी झाला.

ठाण्यात कंटनेर उलटला, वाहतुकीची कोंडी

ठाण्यातील पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड परिसरात कंटेनर पलटी झाला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. हा कंटनेर २६ टन वजनाचे एशियन पेंट घेऊन जात होता. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांच्याकडून हायड्रा मशीनच्या मदतीने रोडवरती पलटी झालेल्या ट्रक रोडच्या एका बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणालाही दुखापत नाही. या अपघातामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

हे ही वाचा…

मुंबईतील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूलचा शेवटचा दिवस, चार भागांना जोडणार पूल बंद होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य