AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विषाची चव कशी असते? औरंगाबादमध्ये पाच मुलींनी केला सांगण्याचा प्रयत्न… नंतर जे घडलं संपूर्ण शहर हादरलं!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाच अल्पवयीन मुलींनी विष प्राशन करुन त्याची चव सांगण्याचा प्रयत्न केला. पण नंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण शहर हादरलं..

विषाची चव कशी असते? औरंगाबादमध्ये पाच मुलींनी केला सांगण्याचा प्रयत्न... नंतर जे घडलं संपूर्ण शहर हादरलं!
PoisonImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 14, 2026 | 1:01 PM
Share

विष घेतल्यानंतर त्याची चव कशी असते हे कळेपर्यंतच अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे विषाची चव नेमकी कशी असते हे आजवर उघड झालेले नाही. विष प्राशन केल्यानंतर त्याची चव लिहीपर्यंत किंवा सांगेपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. असाच एक प्रयत्न अल्पवयीन मुलींनी केलेला आहे. या पाच अल्पवयीन मुलींपैकी चार जणींचा मृत्यू झाला आहे. आता नेमकं काय घडलं हे या प्रकरणात वाचलेल्या एका मुलीने सांगितले आहे.

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 5 अल्पवयीन मुलींनी विषाची चव चाखण्यासाठी ते खाल्ले, त्यापैकी 5 मुलींचा मृत्यू झाला. यातील एक मुलगी वाचली आणि तिने संपूर्ण सत्य सांगितले, त्यानंतरच खरी कहाणी समोर आली. या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात होत आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना 29 जानेवारी रोजी जिल्ह्यातील मोती बिगहा गावात घडली. पाच अल्पवयीन मुली शेतात गेल्या, पण फक्त एकच घरी परतली आणि चार मुलींचा मृत्यू झाला. वाचलेल्या मुलीने याला एक ‘डार्क एक्सपेरिमेंट’ म्हटले. 14 वर्षांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, त्या सर्व जणी एका एकांत ठिकाणी गेल्या आणि एक विषारी पदार्थ खाल्ला, जो सामान्यतः बगळे (हरण किंवा बगळे पक्षी) मारण्यासाठी वापरला जातो. तिने सांगितले की, सर्वांनी स्वाद चाखण्यासाठी तो पदार्थ खाल्ला.

5 पैकी 1 मुलगी कशी वाचली?

मुलीने सांगितले की, “माझ्या मैत्रिणीने म्हटले, ‘चल, हे खाऊया आणि पाहूया की आपण जिवंत राहू की मरू’. त्यांनी बगळे मारण्याचे जहर पाण्यासोबत गटांगळ्या घेतल्या. मी खूप कमी घेतले आणि लगेच थुंकून टाकले, म्हणून मी वाचले.” तिने आपल्या चार मैत्रिणींना (वय 12 ते 15 वर्षे दरम्यान) आपल्या समोर पडून मरताना पाहिले. घाबरलेली मुलगी घरी धावली आणि कुटुंबियांना संपूर्ण कहाणी सांगितली. तिच्या कुटुंबियांनी ताबडतोब तिला उलट्या करण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून पाजली आणि तिचा जीव वाचवला.

पोलिस काय म्हणतात?

दाउदनगरचे SDPO अशोक कुमार दास यांनी सांगितले की, आमच्या चौकशीत असे आढळले की, मुलींना सरस्वती पूजेच्या संध्याकाळी काही मुलांबरोबर फिरताना पाहिले गेले होते. आई-वडिल त्यांना ओरडले आणि रागाच्या भरात ५ मैत्रिणींनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पीडितांपैकी एकाच्या वडिलांनी (जे महाराष्ट्रातून परतलेले स्थलांतरित मजूर होते) पोलिसांच्या या दाव्याला चुकीचे म्हटले आहे. सर्व मुलींचे वय १२ ते १५ वर्षे दरम्यान होते. मृत मुलींच्या नातेवाईकांनी चारही मुलींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला आहे आणि प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....